भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना इंदौरच्या होळकर स्टेडियमवर खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवलेल्या भारताला तिसऱ्या कसोटीत सामन्यात मात्र अपेक्षित सुरुवात मिळू शकली नाही. पहिल्या दोन कसोटींप्रमाणे तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळपट्टी फिरकी गोलंदाजीसाठी अनुकूल असल्याचे दिसले. परिणामी प्रथम फलंदाजी करणारा भारताचा अर्धा संघ 50 धावांच्या आतमध्ये तंबूत परतला.
इंदौर कसोटीत भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि युवा शुबमन गिल (Shubman Gill) आले. अनुभवी केएल राहुल याला या सामन्यात विश्रांती दिली गेली. रोहित शर्माच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. रोहितने 23 चेंडूत बारा धावा करून विकेट गमावली. संघाला दुसरा झटका शुबमन गिलच्या (21) रूपात बसला. भारताची ही सलामीवीर जोडी अवघ्या 34 धावांवर बाद झाली. त्यानंतर संघाची धावसंख्या 36 असताना चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara), तर 44 धावा असताना रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) याने विकेट गमावली. पाचवी विकेट श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) याने गमावली. पुजाराने 1, जडेजाने 4, तर अय्यरने शुन्य धावांवर विकेट गमावली.
संघाची धावसंख्या 45 असताना भारताच्या पाच विकेट्स घेतल्यानंतर ऑस्ट्रेलियाला मात्र जोरदार सुरूवात मिळाली. या पाच पैकी तीन विकेट्स मॅथ्यू कुहनेमन (Matthew Kuhnemann) याने घेतल्या. रोहित, गिल आणि अय्यर यांनी कुहनेमनच्या फिरकीच्या जाळ्यात अडकून विकेट गमावली. तर फिरकीपटू नाथन लायन (Nathan Lyon) यायने पुजारा आणि जडेजा यांना तंबूत धाडले. विराट कोहली खेळपट्टीवर संयमी खेळी दाखवत संघाडा डाव पुढे घेऊन जाईल, असे वाटत होते. उभय संघांतील पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण करणाऱ्या टॉड मर्फी (Todd Murphy) याने 22 धावांवर खेळत असताना विराटची विकेट घेतली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नाणेफेक जिंकून भारताचा फलंदाजीचा निर्णय, केएल राहुल आणि ‘हा’ प्रमुख खेळाडू प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर
“बाबर अजून विराटच्या बरोबरीचा नाही”, पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने सांगितली कमजोरी