भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा अध्यक्ष सौरव गांगुली याने काही दिवसांपुर्वीच भारताच्या श्रीलंका दौऱ्याबाबत माहिती दिली होती. १३ ते २७ जुलै या कालावधीत भारत विरुद्ध श्रीलंका संघात ३ सामन्यांची वनडे आणि टी२० मालिका खेळवली जाणार आहे. कोरोनाच्या सावटाखाली श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हे सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्याचे ठरवले आहे. परंतु हा दौरा सुरू होण्यापुर्वीच रद्द होण्याची चिंता सतावत आहे. यासाठी कोविड-१९ ही जागतिक महामारी कारणीभूत ठरत आहे.
भारत देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने बीसीसीआय भारतीय संघाला परदेशी दौऱ्यावर पाठवण्याच्या प्रयत्नात आहे. परंतु यजमान श्रीलंकामध्येही दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसत आहे. मागील आठवड्यात श्रीलंकामध्ये १६३४२ नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यातील १४७ लोकांना कोरोनामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच भारताच्या श्रीलंका दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत.
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे अधिकारी हा दौरा रद्द होण्याच्या शक्यतेमुळे काळजीत आहेत. असे असले तरीही, श्रीलंका क्रिकेटचे सीईओ यांना विश्वास आहे की, कोरोनाचे संकट वाढत असतानाही भारताचा श्रीलंका दौरा यशस्वीरित्या आयोजित केला जाईल.
एका अधिकाऱ्याने इनसाइड स्पोर्ट्स डॉटशी बोलताना म्हटले की, “देशातील कोविड-१९चे रुग्ण वाढल्याने आमचीही चिंता वाढली आहे. परंतु नुकतेच आम्ही कोरोनाच्या काळातही इंग्लंड आणि इतर देशांचे दौरे यशस्वीपणे आयोजित केले आहेत. त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की, आम्ही भारताचा श्रीलंका दौराही व्यवस्थितपणे पार पाडू. तरीही प्रार्थना करतो की, देशातील कोरोनाचे अधिक वाढू नयेत.”
महत्त्वाच्या बातम्या-
पक्काच समझा! कसोटी चॅम्पियनशीप अंतिम सामना ‘हा’ संघच जिंकणार; पाहा कसं ते?
लढाई कोरोनाविरुद्धची! गरजवंतांच्या मदतीसाठी धावला शिखर धवन, ‘या’ योगदानाबद्दल पोलिसांनीही मानले आभार