काल (31 जानेवारी) स्काय स्टेडियम (Sky Stadium) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील चौथा सामना (4th Match) पार पडला. हा सामना भारताने सुपर ओव्हरमध्ये (Super Over) जिंकला. त्याचबरोबर मालिकेत 4-0 ने विजयी आघाडी घेतली.
न्यूझीलंड संघाचा टी20 क्रिकेट प्रकारात सुपर ओव्हरमध्ये सहाव्यांदा पराभव झाल्यानंतर साऊथीने आपले मत व्यक्त केले आहे.
आंतरराष्ट्रीय टी20मध्ये न्यूझीलंड संघ सहाव्यांदा सुपर ओव्हर खेळल्यानंतर पराभूत झाला आहे. न्यूझीलंडने आत्तापर्यंत एकूण 7 टी20 सामन्यात सुपर ओव्हर खेळले आहेत. त्यातील केवळ 1 सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे.
5 सामन्यांच्या टी20 मालिकेत सलग दुसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये पराभूत झाल्यानंतर साऊथी म्हणाला की, “आमचा संघ विजयाच्या खूप जवळ असताना आम्ही हा सामना हरलो.”
“भारत हा सामना पराभूत झाला होता. परंतु आमच्या संघाने भारताला संधी दिली ज्याचा भारतीय संघाने फायदा घेतला आणि उत्कृष्ट कामगिरी करत सामना जिंकला. अशा स्थितीत पराभूत होणे खूपच वाईट आहे जिथे आम्ही सामन्यात विजयी होऊ शकत होतो तिथे आम्ही भारताला संधी दिली आणि भारताने या संधीचा फायदा घेत हा सामना जिंकला,” असे साऊथी यावेळी म्हणाला.
साऊथीने आत्तापर्यंत न्यूझीलंडकडून 6 टी20 सामन्यात सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली आहे. .यातील केवळ एका सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवला आहे. तर अन्य 5 सामन्यात न्यूझीलंडने पराभव स्विकारला आहे. त्याच्या या खराब आकडेवारीबद्दल बोलताना साऊथी म्हणाला त्यांच्या संघातील खेळाडू युवा होते. त्यामुळे त्याने गोलंदाजीची जबाबदारी स्विकारली.
“आमच्या संघात युवा गोलंदाज आहेत. जेव्हा तुम्ही सामन्यात पराभूत होता आणि जागतिक पातळीच्या फलंदाजांसमोर खेळता तेव्हा हे खूप कठीण असते. भारतासारख्या संघाला जर तुम्ही थोडीशी संधी देत असाल तर ते तुमच्यासाठी खूप कठीण असते,” असे सामन्यात पराभूत झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना साऊथी म्हणाला.
या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 8 बाद 165 धावा केल्या होत्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या न्यूझीलंडलाही निर्धारित 20 षटकात 7 बाद 165 धावा करता आल्या आणि सामन्यात बरोबरी झाली.
त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये प्रथम न्यूझीलंडने फलंदाजी केली. त्यांनी 1 बाद 13 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताला 14 धावांचे आव्हान होते. भारताकडून कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि केएल राहुलने (KL Rahul) फलंदाजी केली. यावेळी भारताकडून राहुलने पहिल्याच चेंडूवर षटकार मारला. तर दुसऱ्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे भारताला शेवटच्या चार चेंडूत 4 धावांची गरज होती.
पण तिसऱ्या चेंडूवर राहुल बाद झाला. त्यानंतर स्ट्राईकवर आलेल्या विराटने चौथ्या चेंडूवर 2 धावा काढल्या. तर पाचव्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.
टीम साऊथी सुपर ओव्हरमध्ये ठरतोय अनलकी; जाणून घ्या ही नकोशी आकडेवारी
वाचा????https://t.co/fRAssJWx6T????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND #SuperOver— Maha Sports (@Maha_Sports) January 31, 2020
बापरे! ४ दिवसात रंगल्या तब्बल ३ सुपर ओव्हर…
वाचा????https://t.co/fnJ5RPXx0I????#म #मराठी #Cricket #TeamIndia #NZvIND #SuperOver #AUSWvENGW— Maha Sports (@Maha_Sports) February 1, 2020