इंडियन आयडॉलच्या 12 वा हंगामाचा ‘किशोर कुमार विशेष’ भाग सध्या त्यावर होत असलेल्या चौफेर टीकेमुळे चर्चित आहे. आयडॉलचे समीक्षक आणि स्पर्धक यांवर टीका करताना दिसत आहेत. अशात काही ट्विटर वापरकर्त्यांनी या टिव्ही शोवर गायकी वारश्याला न्याय मिळत नसल्याची टीका केली आहे.
या हंगामाचा होस्ट आदित्य नारायनने या शोवर होत असलेल्या टिकेला उत्तर देताना सांगितले की, “मला असे वाटते की लोक आयपीएल २०२१च्या अचानक समाप्तीमुळे नाराज आहेत. त्यांचा तो राग ते इंडिअन आयडॉलवर काढत आहेत.”
“आयपीएल २०२१ स्थगित झाल्यामुळे आई-वडील रिमोट हातात घेऊन इंडियन आयडॉल बघत आहेत. त्यामुळे तरुण वर्ग मोठ्या प्रमानात दुःखी असल्यामुळे ते आपला राग या इंडियन आयडॉलवर काढत आहेत. घरात 7-7.30 वाजले की क्रिकेटची आस लावून बसणाऱ्या तरुण मंडळींना आता सगळंच निरर्थक वाटू लागलंय. मी फोन अपमध्ये स्वतःचा क्रिकेट संघ देखील बनवला होता,” असे पुढे आदित्यने सांगितले आहे.
आयपीएल २०२१ हंगाम ४ मे रोजी २९ सामन्यांनंतर स्थगित करण्यात आला होता. कोरोना व्हायरसचा संघांच्या बायोबबलमध्ये वाढलेल्या प्रादुर्भावामुळे बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलला हा निर्णय घ्यावा लागला होता. अजून या हंगामातील एकूण ३१ सामने बाकी आहेत. हे सामने कुठे आणि कधी होणार याबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही. उर्वरित सामने गतवर्षीप्रमाणे संयुक्त अरब अमिरातीत घेण्याचा विचार चालू आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
कोणाचे धडाकेबाज प्रदर्शन, तर कोणाचा मजेशीर स्वभाव; ‘या’ क्रिकेटपटूंचा तिरस्कार करणं खूपच कठीण