प्रत्येक खेळाडू इच्छा असते की त्याचा पदार्पणाचा सामना हा सर्वांच्या स्मरणात राहावा आणि त्यात त्याला चांगली कामगिरी करता यावी. पण प्रत्येकालाच ते शक्य होत नाही खूप खेळाडू आपल्या पहिल्या सामन्यात चांगली कामगिरी करतात, पण काही असेही आहेत जे त्यांच खातं खोलण्यातही अपयशी होतात.
रविवारी (25 जुलै) भारत आणि श्रीलंका यांच्यात टी20 मालिकेचा पहिला सामना झाला. या सामन्यातून पृथ्वी शॉ आणि फिरकीपटू वरूण चक्रवर्ती या दोघांनी अंतरराष्ट्रीय टी20 मध्ये पदार्पण केले. या सामन्यादरम्यान पृथ्वी शॉ सलामीला फलंदाजीस आला. मात्र, तो सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंथा चमीरानी हा चेंडू टाकला होता. तरी, भारतीय संघाने शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांच्या उत्तम फलंदाजीमुळे आणि भुवनेश्वर कुमारसोबतच अन्य गोलंदाजांच्या चांगल्या प्रदर्शनामुळे श्रीलंकेला 38 धावांनी मात दिली.
पण, या सामन्यादरम्यान पृथ्वी शॉ अशा भारतीय खेळाडूंच्या यादीत सहभागी झाला, जे त्यांच्या पदार्पणाच्या आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यामध्ये शून्य धावेवर बाद झाले होते. या लेखात आपण भारताच्या तीन अशा खेळाडूंचा आढावा घेऊ, जे आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पणाच्या सामन्यात शून्यावर बाद झाले.
1. महेंद्र सिंग धोनी, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 2006.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार अशी ओळख असलेला एमएस धोनीचे टी20 मधील पदार्पण काही खास नव्हते. 2006 मध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका सामन्यात धोनीने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्दीला सुरुवात केली. या सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 126 धावा केल्या होत्या आणि भारताला विजयासाठी 127 धावा आवश्यक होत्या.
भारताकडून या सामन्यात धोनी चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानात आला होता. त्यावेळी धोनी दोन चेंडूंना सामोरे गेला. मात्र, दुसऱ्या चेंडूचा सामना करताना तो 0 धावेवर बाद झाला. त्याला चार्ल्स लॅगवेटने त्रिफळाचीत केले होते. असे असले तरी भारताने हा सामना 6 विकेट्सने जिंकला होता.
2. के एल राहुल, भारत विरुद्ध झिम्बाब्वे, 2016
मूळचा कर्नाटकचा असलेला केएल राहुलला 2016 मध्ये झिम्बाब्वे दौऱ्यात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये पदार्पणाची संधी मिळाली. 18 जून 2016 रोजी त्याचे झिम्बाब्वे विरुद्ध टी20 क्रिकेटमध्ये पदार्पण झाले. या सामन्यात झिम्बाब्वेने प्रथम फलंदाजी करत 170 धावा करुन भारतासमोर 171 धावांचे आव्हान ठेवले होते.
भारतीय संघासाठी केएल राहुल आणि मनदीप सिंग यांनी सलामीला येत फलंदाजीला सुरुवात केली. हा सामना केएल राहुलसाठी निराशजनक ठरला, कारण पहिल्याच चेंडूवर तो त्रिफळाचीत झाला. त्याला तिरीपानोने बाद केले. हा सामनाही भारताने 2 धावांनी गमावला.
3. पृथ्वी शॉ , भारत विरुद्ध श्रीलंका 2021
पृथ्वी शॉ आता नव्याने या यादीत सहभागी झाला आहे. शॉने श्रीलंकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी केली होती. सर्वांना त्याच्याकडून अपेक्षा होत्या की तो आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण सामन्यात चांगली कामगिरी करेल. पण, तो सामन्यात पहिल्या चेंडूवर बाद झाला.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे मालिकेवर ऑस्ट्रेलियाची मोहोर, वेस्ट इंडिजचा तिसऱ्या वनडेत ६ विकेट्स केला पराभव
अरर! चक्क बेन स्टोक्सकडून झाली चूक, बाऊंड्री लाईनवर झेलही सुटला अन् संघाने सामनाही गमावला
इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेआधी रिषभ आणि शार्दुलच्या संघात रंगला ‘अजब’ सामना