आयपीएल २०२२ मध्ये नव्याने सहभागी झालेले संघ गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स यांनी जबरदस्त प्रदर्शन केले आहे. गुजरात टायटन्स हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ बनला आहे. संघाला पहिल्या हंगामातच प्लेऑफमध्ये स्थान मिळवून देण्यासाठी कर्णधार हार्दिक पंड्या आणि संघातील इतर खेळाडूंनी जेवढी मेहनत घेतली, तेवढीच मेहनत मुख्य प्रशिक्षक आशीष नेहराने देखील घेतली.
प्रशिक्षक आशीष नेहरा (Ashish Nehra) याने संघासाठी मेगा लिलावात खेळाडूंची निवड करण्यापासून संघाला प्लऑफमध्ये स्थान मिळेपर्यंत महत्वाचे योगदान राहिले आहे. यापूर्वी रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणाऱ्या नेहरा यावेळी मुख्य प्रशिक्षक आहे. ही जबाबदारी त्याने उत्कृष्टपणे पार देखील पाडली आहे. आपण या लेखात आशीष नेहराच्या प्रशिक्षणातील महत्वाच्या मुद्यांवर नजर टाकणार आहोत, ज्याच्या जोरावर गुजरात टायटन्सने हे अप्रतिम प्रदर्शन करून दाखवले आहे.
मेला लिलावात विचारपूर्व खर्च केला पैसा
आयपीएल २०२२ मध्ये मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्ज सारख्या संघांनी त्यांच्या जुन्या खेळाडूंना पुन्हा खरेदी करण्यासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला. पण गुजरात टायटन्सने मात्र एखाद्या खेळाडूला संघात घ्यायचेच, असा हट्ट केल्याचे पाहायला मिळाले नाही. गुजरात आरसीबीनंतर सर्वात कमी खेळाडूंवर बोली लावणारा संघ ठरला. गुजरातने फक्त ३८ खेळाडूंना खरेदी करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातील २० खेळाडूंना खरेदी केले. फ्रँचायझीने लिलावात नेहराच्या मार्गदर्शनात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा संघ तयार केला, जो विजेतेपद देखील पटकावू शकतो.
संघाच्या कॅम्पमध्ये खेळाडूंवर नाहीये कसलाच दबाव