बुधवारी (४ मे) चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात लढत झाली. या सामन्यात आरसीबीने १३ धावांनी विजय मिळवला. आरसीबीचा माजी कर्णधार विराट कोहलीने ३० धावा केल्या, पण यासाठी त्याला तब्बल ३३ चेंडू खेळावे लागले. विराटचे चालू हंंगामातील प्रदर्शन खूपच निराशाजनक राहिले आहे. अशात जरी त्याने धावा केल्या, तरी त्याचा स्ट्राइर रेट खूप कमी दिसला आहे. याच पार्श्वभूमीवर वेस्ट इंडीजचे माजी वेगवान गोलंदाज इयान बिशप यांनी मोठी प्रतिक्रिया दिली.
इशान बिशप (Ian Bishop) यांच्या मते विराट कोहली (Virat Kohli) चालू आयपीएल हंगामात वेगवेगळ्या गोलंदाजांचा शिकार होत आहे आणि ही चिंतेची बाब आहे. बिशप यांच्या म्हणण्याप्रमाणे विराट चालू हंगामात त्याच्या लयीत दिसत नाहीये. एका वृत्तसंस्थेशी बोलताना बिशप म्हणाले की, “सुरुवातीच्या १०-१५ धावांच्या खेळीदरम्यान तो चेंडूंच्या बरोबरीने धावा करत नाहीये आणि तो तसे करण्याची इच्छाही दाखवत नाहीये. त्याने मागच्या सामन्यात षटकार मारून स्ट्राइक रेट सुधरवला, पण त्याची धावा करण्याची गती मंदावली.”
“विराटसोबत हे फक्त याच हंगामात होत नाहीये, त्याचे मागच्या हंगामात देखील असेच होत होते. हे चिंताजनक आहे. डावाच्या सुरुवातीला एवढे चेंडू खेळल्यानंतर तुम्हाला वेगाने धावा करता येत नसतील, तर त्याला मोठी खेळी करावी लागेल. जर तुम्ही मोठी खेळी करू शकला नाही, तर संघासाठी ही अवघड स्थिती असेल,” असे विराट पुढे बोलताना म्हणाला.
बिशपच्या मते विराट अलिकडच्या काळात फिरकी गोलंदाजीवर जास्त बाद होताना दिसत आहे. ते म्हणाले, “वेस्ट इंडीजच्या भारत दौऱ्यात रोस्टन चेजने त्याला बाद केले होते. आपण त्याला मागच्या काही कसोटी सामन्यांमध्ये ऑफ स्पिनर्सच्या चेंडूवर बाद होताना पाहिले आहे. मी याविषयी चिंतेत आहे. मला याचीही चिंता वाटत आहे की, वेगवेगळ्या पद्धतीचे गोलंदाज त्याला बाद करत आहेत. त्याला गोलंदाजांवर वर्चस्व बनवता येत नाहीये.”
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जविरुद्धच्या सामन्याच्या आधी आरसीबी आणि गुजरात टायटन्स यांच्यात लढत झाली होती. विराटने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली, पण हे अर्धशतक पूर्ण करण्यासाठी ४५ चेंडू खेळावे लागले. त्याच्या संथगतीच्या खेळीचा परिणाम सामन्याच्या परिणामांवर पडला. आरसीबीने हा सामना ६ विकेट्सने गमावला.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘त्यावेळी कोणीही माझ्यावर विश्वास दाखवला नाही’, आरसीबीच्या माजी कर्णधारानं मांडल्या आपल्या भावना
फ्लॉप ठरत असलेल्या विराटला तोंडावर बोलला मॅक्सवेल; म्हणाला, ‘आता मी तुझ्यासोबत बॅटिंग नाही करू शकत’
भारतीय संघाने २०१९ विश्वचषक का गमावला? खुद्द युवराज सिंगने सांगितले कारण