भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माने आपल्या वनडे पदार्पणाच्या मालिकेची आठवण सांगत आपल्या बूट, वस्तू आणि राहुल द्रविडबद्दलच्या मनोरंजक किस्स्याचा खुलासा केला आहे.
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवालबरोबर (Mayank Agarwal) इंस्टाग्राम लाईव्ह चॅटदरम्यान बोलताना इशांत म्हणाला की, “मला लगेच फोन आला होता की, मला आता वनडे मालिका खेळण्यासाठी आयर्लंडला (Ireland) जायचे आहे. मला हेदेखील सांगण्यात आले होते की, तिथे खूप थंडी आहे. तेथील वातावरणामुळे एमएस धोनी (MS Dhoni), दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) आणि आरपी सिंग (RP Singh) अगोदरच आजारी पडले होते.”
“माझे सामान विमानतळावर अदलाबदल झाले होते आणि हॉटेलमध्ये त्यामुळे मला समस्यादेखील झाली होती. जेव्हा मी आयर्लंडला पोहोचलो, तेव्हा मी आपल्या सामानाची वाट पाहत होतो. मी माझ्या व्यवस्थापकाला फोन केला. तो म्हणाला की, सर मी तर माझ्या सामानाची वाट पाहत होतो. मला वाटले की, व्वा! ही तर खूपच चांगली सुविधा आहे. कारण यापूर्वी रणजी ट्रॉफी दरम्यान आम्ही आमचे सामान स्वत:च घेऊन जात होतो,” असेही तो पुढे म्हणाला.
“सर्वजण सराव करत होते आणि मी केवळ उभा होतो. त्यानंतर राहुल द्रविड (Rahul Dravid) माझ्याजवळ आले आणि मला म्हणाले की, तू सराव का करत नाहीस? मी निराश होत म्हणालो की, राहुल भाई माझे सामानच आलेले नाही. ते पुढे म्हणाले की, याचा अर्थ काय आहे? मी म्हणालो की, मी विमानात ठेवले होते. परंतु मला ते मिळाले नाही,” असे द्रविडबद्दल बोलताना तो म्हणाला.
“राहुल पुढे म्हणाले की, आता तू सराव कसा करणार? त्यानंतर मी चिंतेत पडलो होतो. शेवटी मी झहीर (Zaheer Khan) भाईकडून बूट (Shoes) मागून आपला पहिला वनडे सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला होता,” असेही तो पुढे म्हणाला.
भारताकडून इशांतने खेळले आहेत एकूण ९७ कसोटी सामने-
इशांतने भारतीय संघाकडून आतापर्यंत ९७ कसोटी सामने खेळले आहेत. त्यात त्याने ३२.३९ च्या सरासरीने २९७ विकेट्स घेतल्या आहेत. न्यूझीलंड दौऱ्यात इशांतला दुखापत झाली होती त्यामुळे त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी मुकावे लागले होते. तरी सध्या त्याला लॉकडाऊनमुळे आपल्या दुखापतीवर उपचार करण्यासाठी चांगला वेळ मिळाला आहे.
इशांतने २९ जून २००७ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यातून वनडेत पदार्पण केले होते. त्या सामन्यात त्याने ७ षटके टाकताना ३८ धावा दिल्या होत्या. त्या दरम्यान त्याला एकही विकेट घेता आली नव्हती. तो सामना भारताने ६ विकेट्सने जिंकला होता.
ट्रेंडिंग घडामोडी-
-आता धोनीला भारतीय संघात पाठींबा देण्यासाठी ‘हा’ मोठा व्यक्ती मैदानात
-भारतीय संघाचा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या चाहत्यांसाठी खुशखबर! लवकरच होणार…
-. . . म्हणून क्रिकेटपटूंचे टेन्शन वाढणार, क्रिकेट खेळण्याआधी करावे लागणार हे काम