जून महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जाणार आहे. भारतीय संघ लागोपाठ दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे. अंतिम सामना इंग्लंडमध्ये होत असल्याने या सामन्यात भारतीय संघ एकच फिरकीपटू खेळवू शकतो. या एका जागेसाठी भारतीय संघात तीन दावेदार दिसून येत आहेत. त्यामुळे या संघात कोणाला स्थान मिळणार? याचे उत्तर भारताचा अनुभवी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकने दिले आहे.
दिनेश कार्तिक नुकताच एका मुलाखतीत बोलत होता. त्यावेळी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात कोणत्या फिरकीपटूला संधी मिळणार? असा प्रश्न विचारला असता तो म्हणाला,
“इंग्लंडमधील परिस्थिती नक्कीच फिरकीला अनुकूल नसेल. मागील वेळी अंतिम अकरामध्ये आपण अश्विन व जडेजा दोघांनाही संधी दिली होती. ही मोठी चूक होती. यावेळी तसे होण्याची शक्यता नाही. यावेळी एकच फिरकीपटू अंतिम अकरामध्ये असेल.”
कार्तिक पुढे बोलताना म्हणाला,
“यावेळी जडेजा व अश्विन दोघेही फिट असल्यास अक्षरला नक्कीच संधी मिळणार नाही. शार्दुल ठाकूर माझ्या मते संघात असेल. भारताला मागील वेळेसचे अपयश भरून काढण्याची यावेळी चांगली संधी आहे.”
भारतीय संघाने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या पहिल्या वेळेसही अंतिम फेरी प्रवेश केला होता. त्यावेळी न्यूझीलंडने भारतीय संघाला पराभूत केलेले. यावेळी भारतीय संघाचा अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामना होणार आहे. ओव्हल मैदानावर 6 जूनपासून हा सामना सुरू होईल.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासाठी संभाव्य भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, उमेश यादव.
(Jadeja Or Ashwin Only Spinner In WTC Final For India Dinesh Karthik Said )
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
केएल राहुल की केएस भरत, कुणाला मिळणार डब्ल्यूटीसी फायनल खेळण्याची संधी?
आरसीबीला पहिला विजय मिळवून देणारी कनिका आहे तरी कोण? वनडेत ठोकलय चक्क त्रिशतक