भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेटचे सामने नेहमी अत्यंत अटीतटीचे होत असतात. त्यामुळे मैदानावर अनेकदा खेळाडूंमध्ये वाद झाल्याचे देखील पाहायला मिळते. माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीर व पाकिस्तानचा माजी यष्टीरक्षक कामरान अकमल यांच्या दरम्यान असाच वाद 2010 आशिया चषकावेळी झालेला. या वादाची भारत पाकिस्तान सामन्यावेळी नेहमी चर्चा होते. त्यानंतर आता तब्बल 13 वर्षांनंतर स्वतः अकमलने या वादाविषयी खुलासा केला आहे.
श्रीलंका येथे झालेल्या या आशिया चषकातील सामन्यात दोन्ही संघांदरम्यान काट्याची लढत झालेली. भारतीय संघ धावांचा पाठलाग करत असताना ड्रिंक्स ब्रेकमध्ये गौतम गंभीर व कामरान अकमल यांच्या दरम्यान चांगलीच बाचाबाची झालेली. गंभीर व अकमल हे मैदानाबाहेर एकमेकांचे चांगले मित्र असतानाही ही घटना घडली. त्याच घटनेबद्दल बोलताना आता अकमलने नवा खुलासा केला आहे.
एका मुलाखतीत बोलताना अकमल म्हणाला,
“गंभीर आणि माझ्यात जो वाद झाला तो केवळ गैरसमजातून झाला होता. तो एक शानदार व्यक्ती आहे. मात्र, त्यावेळी माझीच चूक होती. काही फटके खराब खेळल्याने तो स्वतःशीच बोलत होता. माझा समज झाला की तो मला काही बोलत आहे. त्यामुळे मैदानावर तणाव निर्माण झाला. मैदाना बाहेर आम्ही तो वाद मिटवला.”
भारत-पाकिस्तान सामन्यावेळी या वादाची नेहमी चर्चा होते. त्यावेळी भारतीय संघाचा कर्णधार असलेला एमएस धोनी याला हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करावी लागलेली. या सामन्यात गंभीर-अकमल व्यतिरिक्त शोएब अख्तर व हरभजन सिंग यांच्या दरम्यानही अखेरच्या षटकात बाचाबाची झालेली. भारतीय संघाने या सामन्यात एक चेंडू राखून थरारक विजय मिळवलेला.
(Kamran Akmal Tell Story Of His Fight With Gautam Gambhir In 2010 Asia Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
नेमारची गर्लफ्रेंड आजमावणार बॉलीवूडमध्ये नशीब! गिरवतेय हिंदी आणि कथ्थकचे धडे
आनंदाची बातमी! तिसऱ्या कसोटीत खेळण्यासाठी ‘हा’ ऑस्ट्रेलियन तयार; म्हणाला, ‘मी 100 टक्के फिट…’