गुरुवारी(२५ नोव्हेंबर)भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत . ३ कसोटी सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर रंगणार आहे. या सामन्यापूर्वी अनेक दिग्गजांनी आपले मत मांडले आहे. अशातच माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने देखील भारतीय संघाला कुठला फलंदाज जास्त अडचणीत टाकू शकतो, याबाबत भाष्य केले आहे.
या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने म्हटले की, केन विलियमसन एक महान क्रिकेटपटू आहे. तसेच गोष्ट जेव्हा कसोटी क्रिकेटची येते त्यावेळी तो अप्रतिम कामगिरी करण्यात मास्टर आहे. तसेच दुसऱ्या कसोटी सामन्यात मुंबईची खेळपट्टी देखील भारतीय फलंदाजांना अडचणीत टाकू शकते. ती खेळपट्टी न्यूझीलंडच्या क्रिकेटपटूंसाठीही फायदेशीर ठरेल. कारण येथे चेंडूला बाऊन्स मिळत असतो, तर भारतीय गोलंदाजांना या खेळपट्टीवर अडचणींचा सामना करावा लागू शकतो.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “जर दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेबद्दल बोलायचं झालं तर, केवळ विलियमसनच टीम इंडियाला आव्हान देऊ शकतो, कारण केन विलियमसन एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे.” केन विलियमसनने भारतात १३ डावांमध्ये ३५.४६ च्या सरासरीने ४६१ धावा केल्या आहेत. ज्यामध्ये एक शतक आणि तीन अर्धशतकांचा समावेश आहे.”
तसेच भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आणि रोहित शर्मा यांच्याबद्दल बोलताना इरफान पठाण म्हणाला की, “या दोघांना एकमेकांसोबत काम करताना कुठलीही अडचण येणार नाही. कारण राहुल द्रविडला छेडछाड करायला आवडत नाही.ते जेव्हा क्रिकेट खेळायचे आणि संघाचे कर्णधार होते. त्यावेळी देखील ते संघात फार कमी बदल करायचे आणि खेळाडूंचा उत्साह वाढवायचे.”
पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ – शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे (कर्णधार), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, इशांत शर्मा, उमेश यादव
महत्त्वाच्या बातम्या –
दर्जेदार! भारतात खेळताना न्यूझीलंडच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम ५ खेळी
दुर्दैवच अजून काय! रणजी ट्रॉफीचे ३ दिग्गज कर्णधार, ज्यांना मिळाली नाही टीम इंडियाकडून खेळण्याची संधी
रहाणेकडे धोनीला, तर अश्विनकडे हरभजनला मागे टाकण्याची संधी; कानपूर कसोटीत तुटणार अनेक विक्रम