इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) चौदावा हंगाम कोरोनामुळे स्थगित झाल्याने सर्व क्रिकेटप्रेमींना आगामी टी२० विश्वचषकाचे वेध लागले आहेत. दिवसेंदिवस या विश्वचषकाबाबत बातम्या किंवा खेळाडूंच्या प्रतिक्रिया समोर येताना दिसतायेत. याच निमित्ताने पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सलमान बट याने भारतीय संघ व भारतीय संघाच्या सलामीवीरांविषयी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बटने दिली अशी प्रतिक्रिया
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार व २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरणात मुख्य आरोपी ठरल्यानंतर निलंबन झालेल्या सलमान बटने एका यूट्यूब चॅनलवर दिलेल्या मुलाखतीत बोलताना भारतीय संघ व भारतीय संघातील सलामीवीरांविषयी आपले मत व्यक्त केले. बट म्हणाला, “भारताचा संघ आगामी टी२० विश्वचषकाचा दावेदार वाटतो. सर्व संघ संतुलित आहे. भारतीय संघासाठी एक चांगली डोकेदुखी देखील आहे. रोहित शर्मा भारताचा प्रमुख सलामीवीर असेल. त्याचा साथीदार म्हणून मी केएल राहुलची निवड करेल. पृथ्वी शॉ देखील चांगला पर्याय होईल. परंतु, त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव आहे. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करून देखील शिखर धवनसाठी या संघात जागा बनवणे काहीसे अवघड दिसते.” सलमान बटने निलंबन रद्द झाल्यानंतर काही काळ प्रथमश्रेणी क्रिकेट खेळले. मात्र राष्ट्रीय संघात जागा बनवण्यात त्याला अपयश आले.
टी२० विश्वचषकासाठी भारताकडे अनेक पर्याय
आगामी आयसीसी टी२० विश्वचषक भारतात खेळविण्यात येणार असल्याचे निश्चित झाले होते. परंतु, सध्या भारतातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही स्पर्धा यूएई किंवा इतर ठिकाणी हलवणे विषयी चर्चा सुरू आहे. भारतीय कर्णधार विराट कोहलीने यापूर्वीच स्पष्ट केले आहे की, रोहित शर्मा भारताचा प्रथम पसंतीचा सलामीवीर असेल. सलामीवीरच्या दुसऱ्या स्थानासाठी भारताकडे पृथ्वी शॉ, केएल राहुल व शिखर धवन असे पर्याय उपलब्ध आहेत. तिघांनी देखील आयपीएल २०२१ आयपीएलमध्ये धावांची बरसात केली होती. हे तिघे देखील आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणारा खेळाडूंच्या यादीत पहिल्या पाचमध्ये आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
पृथ्वी शॉच्या कथित गर्लफ्रेंडचा बिल्लो रानी गाण्यावर जबरदस्त डान्स, पाहा व्हायरल व्हिडिओ
आयपीएलनंतर पहिल्यांदाच समोर आला एमएस धोनीचा व्हिडीओ, पत्नी साक्षीने शेअर केला तो खास क्षण