मागीलवर्ष जगभरातील अनेक क्षेत्रांप्रमाणे क्रीडा क्षेत्रासाठीही फार खास ठरले नाही. अनेक महिने जगतभरातील बऱ्याच देशात लॉकडाऊन लागल्याने क्रीडा क्षेत्र ठप्प झाले होते. या दरम्यान भारतीय क्रिकेटपटूनांही आपापल्या घरातच राहावे लागले होते. या लॉकडाऊनच्या काळात नक्की काय काय केले याबद्दल आता भारताचा फलंदाज केएल राहुलने खुलासा केला आहे.
असा घालवला केएल राहुलने लॉकडाऊनचा काळ
त्याने दिलेल्या एका मुलाखतीत म्हटले की, “लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात मी स्वतःला मुक्त ठेवले होते. मी डाएटचे पालन करत नव्हतो. मी खूप साखरेचे पदार्थ खात होतो. तसेच पिज्जा, बर्गर आणि खूप बाहेरचे पदार्थ खात होतो. सरावावर पण दुर्लक्ष करत होतो.”
सुरुवातीला व्यायामाचे सामान नव्हते
त्याने म्हटले ,” सुरुवातीच्या काळात माझ्याकडे व्यायाम करण्यासाठी सामग्री उपलब्ध नव्हती. कारण सर्व बंद होते. त्यांनतर मी स्ट्रेंथ ट्रेनिंगवर लक्ष दिले. कारण जेव्हा ही खेळाला सुरुवात होईल, तेव्हा मी सुद्धा तयार असेल. मला सराव करायला आवडते. क्रिकेट सोबतच मी इतर खेळही खेळतो.”
ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झाली होती दुखापत
भारतीय संघाचा युवा यष्टिरक्षक फलंदाज केएल राहुल हा त्याच्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तसेच त्याने न्यूझीलंड दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या ५ टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या मालिकेत महत्वाची भुमिका बजावत भारतीय संघाला ५-० ने मालिका जिंकवून दिली होती. त्यांनतर लॉकडाऊननंतर युएईमध्ये पार पडलेल्या आयपीएलच्या १३ व्या हंगामातही चांगली कामगिरी केली होती.
यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला. या दौऱ्यातील कसोटी मालिकेसाठी संघात स्थान मिळवण्यात त्याला संघर्ष करावा लागला. त्यातच तो सरावादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. आता तो आगामी इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट मालिकांमधून भारतीय संघात पुनरागमन करण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
आरसीबीसाठी आनंदाची गोष्ट! ‘या’ खेळाडूने ठोकलंय सलग तिसरं शतक, ५ सामन्यात ५०० पेक्षा अधिक धावा
विराटच्या शतकांचा दुष्काळ संपेना ! ‘इतके’ सामने झाले नाही उंचावली बॅट
‘विचार करतोय चौथ्या कसोटीसाठी खेळपट्टी कशी असेल?’ रोहितचा टीकाकारांना टोमणा