जयपूर, राजस्थान येथे दि.२ ते ७ मार्च या कालावधीत होणाऱ्या “ ६७ व्या वरिष्ठ गट राष्ट्रीय कबड्डी” स्पर्धेकरिता महाराष्ट्राने आपले दोन्ही संघ जाहीर केले. पुरुष गटात राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरीचे ३, उपविजेत्या मुंबई शहरेचे ३ खेळाडू या संघात निवडण्यात आले आहेत. महिला गटात राज्य अजिंक्यपद स्पर्धेतील विजेत्या पुण्याचे ३, उपविजेत्या मुंबई शहर २ व मुंबई उपनगरच्या २ खेळाडूंची या संघात वर्णी लागली आहे.
आवास, ता. अलिबाग जि. रायगड येथे दोन्ही संघाचे १७ फेब्रुवारी पासून २०-२० खेळाडूचे शिबिर सुरू होते. यानंतर राष्ट्रीय स्पर्धेकरता अंतिम १२-१२ खेळाडूंचे संघ जाहीर करण्यात आले. महाराष्ट्र संघ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स येथून स्पर्धेकरिता जयपूर-राजस्थान येथे रवाना होईल.
महाराष्ट्र पुरुष संघ:
स्वप्नील शिंदे- रत्नागिरी, शुभम शिंदे- रत्नागिरी, अजिंक्य अशोक पवार- रत्नागिरी, आकाश कदम- मुंबई उपनगर, संकेत सावंत- मुंबई शहर, सुशांत साईल- मुंबई शहर, पंकज मोहिते- मुंबई शहर, बिपीन थळे- रायगड, मनोज बोंद्रे- पुणे, रोहित बन्ने- सांगली, तुषार पाटील- कोल्हापूर, महारुद्र गर्जे- बीड
प्रशिक्षक: आशिष म्हात्रे
व्यवस्थापक: संतोष भोसले
महाराष्ट्र महिला संघ:
मेघा कदम- मुंबई शहर, पोर्णिमा जेधे -मुंबई शहर, पूजा शेलार -पुणे, पूजा जाधव -मुंबई उपनगर, श्रद्धा चव्हाण- पुणे, सायली जाधव -मुंबई उपनगर, सोनाली हेळवी- सातारा, अंकिता जगताप- पुणे, सुवर्णा लोखंडे -औरंगाबाद, तेजस्वी पाटेकर- मुंबई उपनगर, निकिता कदम -ठाणे, ऐश्वर्या काळे -पालघर
प्रशिक्षक: सिमरन गायकवाड
व्यवस्थापक: अनघा कांगणे