भारतीय क्रिकेट संघात असे अनेक क्रिकेटपटू आहेत, ज्यांच्या प्रेमकहाणीचे रंजक किस्से आपण ऐकले आहेत. विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्या प्रेमाचा किस्सा अजूनही अधूनमधून सोशल मीडियावर ट्रेंड करत असतो. परंतु भारतीय संघातील असा एक खेळाडू आहे, ज्याने थेट मैदानावरून लग्नाच्या मंडपात प्रवेश केला होता. हा भारतीय क्रिकेटपटू अजून कोण नसून, मनिष पांडे आहे.
भारतीय संघासाठी २६ वनडे सामने आणि ३९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या मनीष पांडेच्या विवाहातील हा मजेशीर किस्सा फार कमी लोकांना माहीत असेल. भारतात क्रिकेटला धर्म मानले जाते. त्यामुळे हे खेळाडू वैयक्तिक आयुष्यातील सुख-दु:ख यांचा विचार न करता आपल्या संघासाठी खेळण्याचा विचार करत असतात. तसेच विवाह होणे हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण असतो. परंतु विवाह होण्याचा कालावधीत मनीष पांडेने क्रिकेटला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला होता.
त्याने विवाहाच्या एक दिवसापूर्वी सैयद मुश्ताक अली स्पर्धेत आपल्या नेतृत्त्वाखाली कर्नाटक संघाला जेतेपद मिळवून दिले होते. त्यांनतर त्याने संध्याकाळी विवाहासाठी मुंबईची वाट धरली होती.
मनीषचा ज्यावेळी विवाह ठरला होता. त्यावेळी तो देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा खेळण्यात व्यस्त होता. त्यानंतर त्याला भारतीय संघाचे देखील प्रतिनिधित्व करायचे होते. याच कालावधीत त्याचा विवाह ठरला होता. सैयद मुश्ताक अली स्पर्धेचा अंतिम सामना झाल्यानंतर मुंबईला रवाना होण्यापूर्वी त्याने म्हटले होते की, “मी भारतीय संघाकडून खेळण्यास पूर्णपणे तयार आहे. परंतु त्यापूर्वी मला आणखी एक मालिका खेळायची आहे. उद्या माझा विवाह आहे. ”
कोण आहे मनीष पांडेची पत्नी?
मनीष पांडे आणि त्याची पत्नी अश्रीता हे दोघेही २ डिसेंबर २०१९ मध्ये विवाह बंधनात अडकले होते. अश्रीता ही एक दाक्षिणात्य अभिनेत्री आहे. तसेच ती अनेक जाहिरातींमध्येही झळकली आहे. तिने तेलुगु आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच २०१० मध्ये ती टाइम्स ऑफ इंडिया क्लीन फ्रैश फेस पुरस्काराची मानकरी ठरली होती.
मनीष पांडेची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मनीष पांडेने अनेकदा भारतीय संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली आहे. त्याला २०१५ मध्ये वनडे संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने एकूण २६ सामने खेळले आहेत. यात त्याला ३५.१ च्या सरासरीने ४९२ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने दोन अर्धशतक तर एक शतक झळकावले आहे. तसेच त्याच्या टी-२० कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने आतापर्यंत एकूण ३९ सामने खेळले आहेत. यात त्याला ४४.३ च्या सरासरीने एकूण ७०९ धावा करण्यात यश आले आहे. यात त्याने ३ अर्धशतक झळकावले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
मुंबई-चेन्नई नव्हे तर ‘या’ शहराला मिळणार टी२० विश्वचषकाचे यजमानपद? बैठकीत झाली चर्चा
बापमाणूस गमावला; आता भूवीच्या आईचीही तब्येत नाजूक, रुग्णालयात आहेत भरती
विश्वविजेत्या भारतीय संघाचा ‘हा’ शिलेदार खेळणार परदेशी लीग, ठरला पहिलाच खेळाडू