मुंबई । आयपीएल सुरु होऊन आज बरेच दिवस झाले. या काळात आय़पीएलचे ३६ सामने झाले आहेत. त्यात प्रत्येक संघ जवळपास ८ ते १० सामने खेळला आहे.
काही संघ स्पर्धेतून बाहेर जायच्या मार्गावर आहेत तर काही संघ स्पर्धेत पुढच्या फेरीत प्रवेश करतील.
आयपीएलमध्ये प्रत्येक संघ हा दुसऱ्या संघासोबत दोन सामने खेळतो. एक सामना हा घरच्या मैदानावर होतो तर दुसरा सामना हा विरोधी संघाच्या मैदानावर होतो.
असे असले तरी आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणुन ज्या संघांकडे पाहिले जाते ते मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स अजुन एकही सामना खेळले नाहीत तर दुसऱ्या बाजुला किंग्ज ११ पंजाब अाणि राजस्थान राॅयल्स संघातही एकही सामना झाला नाही.
READ- धोनी-रोहित शर्माला युसुफ पठाण पडला भारी
आज या संघात सामने होणार आहेत. तसेच लगेच पुढच्या ४-५ दिवसांत हे संघ एकमेकांविरुद्ध खेळणार आहेत.
मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हा सामना आज वानखेडेवर तर याच संघातील दुसरा सामना ९ मेला इडन गार्डनवर होत आहे.
किंग्ज ११ पंजाब अाणि राजस्थान राॅयल्स हा सामना आज इंदोरला होत असुन पुढचा सामना परवा अर्थात ८ मे रोजी एक दिवसाच्या विश्रांतीने जयपूरला होत आहे.