१९८३ मध्ये मोहिंदर अमरनाथ भारतीय क्रिकेट संघामध्ये चौथ्यांदा पुनरागमन करत होता. कधी संघामध्ये तर कधी संघाबाहेर असे संपूर्ण कारकिर्दीत त्याच्याबरोबर घडले. १९८३ ला भारतीय संघ वेस्ट इंडिजच्या दौर्यावर गेला होता. पहिल्या तीन कसोटी सामन्यातील २ सामने अनिर्णित राहिले आणि १ वेस्ट इंडीज संघाने जिंकला होता. वेस्ट इंडीजच्या वेगवान गोलंदाजांची बाजू भक्कम होती. मॅल्कम मार्शल, मायकेल होल्डिंग आणि अॅंडी रॉबर्ट्स हे सर्व गोलंदाजांनी त्यांच्या उंचीचा फायदा घेत भारतीय फलंदाजांना त्रस्त करून सोडले होते. भारतीय फलंदाजांना खेळण्यासाठी उसळते चेंडू (बाउन्सर) मिळत होते. त्यावेळी मोहिंदर अमरनाथने त्यांच्या खराब फॉर्म मधून बाहेर येण्यासाठी वडील लाला अमरनाथ यांची मदत घेतली होती. यानंतर जेव्हा मोहिंदर अमरनाथ परत मैदानावर आला तेव्हा त्याची क्रीजवर उभे राहण्याची पद्धत बदलली होती. आता त्याचा स्टांस जरा खुला झाला होता. त्याला इंग्रजीत ‘टू आइड’ (‘two eyed’) असे म्हणतात. लाला अमरनाथ म्हणाले होते की, असे उभे राहिल्यास आखूड टप्याचे चेंडू खेळणे सोपे होईल.
१९८३ ला वेस्ट इंडिजविरुद्ध दुसर्या कसोटी सामन्यात मोहिंदर अमरनाथने सामनावीर पुरस्कार जिंकला होता. पहिल्या डावात ५८ धावा आणि दुसऱ्या डावात शतक ठोकले होते. तेही वेस्ट इंडिजच्या तिखट माऱ्यासमोर. तिसरा सामना पावसामुळे बरोबरीत सुटला होता. चौथ्या सामन्यात जे घडले त्यात मोहिंदर अमरनाथचे वैचारिक सामर्थ्य दिसले.
मोहिंदर अमरनाथने पहिल्या डावात ९१ धावा केल्या. भारताचा तो एकमेव फलंदाज होता ज्याने ३० धावांपेक्षा अधिक धावा केल्या होत्या. अँडी रॉबर्ट्सने १६ षटकांत ४ गडी बाद केले होते. होल्डिंगने वेंगसरकर आणि गावसकर यांना बाद केले. नंतर वेस्ट इंडिजने फलंदाजी करत पहिल्या डावात २७७ धावांची आघाडी घेतली. भारतीय संघ हा सामना निश्चितच हरणार असे वाटत होते.
दुसर्या डावात फलंदाजी करताना भारतीय सलामीवीरांनी अर्धशतकाची सलामी दिली. गावस्कर १९ धावांवर बाद झाले. नंतर अमरनाथ फलंदाजीसाठी आला आणि गायकवाड यांच्या सोबत चांगली भागीदारी रचली. अमरनाथला आखूड टप्याचे चेंडू खेळणे अवघड जाते हे सर्वांना माहिती होते. मायकेल होल्डिंगने याचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. त्याने फेकलेला एक चेंडू थेट अमरनाथच्या हनुवटीला लागला आणि अमरनाथ जखमी होऊन जमिनीवर पडला. त्याला ताबडतोब मैदानातून बाहेर काढावं लागलं. त्याला रक्ताने माखलेल्या टी-शर्टसह रुग्णालयात नेण्यात आले, जेथे उपरादरम्यान त्याच्या चेहऱ्यासार ६ टाके पडले. साधारण अर्ध्या तासाच्या आत तो पुन्हा ड्रेसिंग रूममध्ये आला, जिथे त्याने प्रथम आपल्या शर्टवरचे रक्त साफ केले. लेग स्पिनर लक्ष्मण शिवरामकृष्णन त्याच्या जवळच बसले होते आणि अमरनाथची सतत देखरेख करत होते.
थोड्या वेळात अँडी रॉबर्ट्सने बलविंदर संधू यांना पायचीत बाद केले. भारताने आपला पाचवा गडी गमावला होता. अमरनाथ ड्रेसिंग रूममध्ये उभे राहून फलंदाजीला जाऊ लागला. त्याला विचारण्यात आले की तू फलंदाजी करण्याच्या स्थितीत आहेस का, त्यानी होकार दिला आणि तो फलंदाजीसाठी निघून गेला. लोकांनी पाहिले की मोहिंदर अमरनाथच्या खेळपट्टीवर पोहोचला आणि लक्ष्मण शिवरामकृष्णन मागून पळत आहे. खरं तर अमरनाथ फलंदाजीसाठी इतका उत्साही होता की त्यानी घाईत एब्डॉमेन गार्ड घातला नव्हता. शिवरामकृष्णन ड्रेसिंग रूममध्ये अमरनाथचा गार्ड दिसला आणि मग ते घेऊन थेट मैदान गाठले.
यानंतर, अमरनाथने आपल्या १८ धावसंख्येवरुन पुढे खेळण्यास सुरुवात केली. होल्डिंगने पहिला चेंडू पुन्हा उसळी घेणारा टाकला आणि अमरनाथने त्या चेंडूवर पुलाचा शॉट लगावला. चेंडू सरळ सीमारेषेबाहेर षटकार गेला. ८० धावांवर अमरनाथ यांचा डाव थांबला. भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघांइतक्याच बरोबरीत धावा केल्या. त्यामुळे वेस्ट इंडीजला जिंकण्यासाठी केवळ १ धावेची आवश्यकता होती. ती १ धावही वेस्ट इंडिजला नो बॉलच्या बदल्यात मिळाली. सईद किरमानीने नो बॉल टाकला होता. त्यामुळे वेस्ट इंडिजने सामना सहज जिंकला. हा सामना वेस्ट इंडिजने जिंकला असला तरी सामनावीर अमरनाथ ठरला होता.
या सामन्यानंतर पुन्हा एकदा अँटिग्वा येथे झालेल्या शेवटच्या कसोटी सामन्यात अमरनाथच्या बॅटमधून मोठ्या धावा निघाल्या. त्यानी पहिल्या डावात ५४ आणि दुसऱ्या डावात ११६ धावा केल्या. अशा प्रकारे, संपूर्ण दौऱ्यात अमरनाथनी ५९४ धावा केल्या होत्या. या दरम्यान त्यानी ६६.४४ च्या सरासरीने दोन शतके आणि चार अर्धशतके ठोकली होती.
अल्पावधीतच पुढे अमरनाथने विश्वचषक उपांत्य फेरी आणि अंतिम फेरीत चांगली कामगिरी केली आणि त्यांच्या कामगिरीमुळे भारतीय संघाच्या हाती पहिल्यांदा विश्वचषक आला. विश्वचषकातील अंतिम सामन्यात अमरनाथ ७ षटकांत ३ गडी बाद करून सामनावीर ठरला होता.