भारत आणि ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय क्रिकेट संघ जागतिक एकदिवसीय क्रिकेटमधील ‘दादा संघ’ म्हणून ओळखले जातात. २१ व्या शतकाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाच्या संघाने जागतिक क्रिकेटवर वर्चस्व गाजवले. रिकी पॉन्टिंगच्या नेतृत्वाखाली हा संघ एकेकाळी अजेय समजला जायचा. २०१० नंतर दिग्गज क्रिकेटपटू निवृत्त होत गेल्याने ह्या संघाला उतरती कळा लागली. मात्र त्याच सुमारास जागतिक क्रिकेटच्या क्षितिजावर भारतीय संघाचा महासत्ता म्हणून उदय होत गेला. एकदिवसीय क्रिकेटमधील अनेक महान खेळाडू भारताने जगाला दिले. आजच्या घडीला भारत एकदिवसीय क्रिकेटमधील अव्वल दर्जाचा संघ आहे.
दोन्ही संघाचा इतिहास पाहता उभय संघांमधील मालिका कायमच रंगतदार होतात. तुल्यबळ संघांमधील लढत असल्याने ह्या मालिकांमध्ये खेळाडूंद्वारे नेहमीच नवनवीन विक्रम रचले जातात. आजच्या लेखात आपण अशाच ३ भारतीय खेळाडूंचा आढावा घेणार आहोत, ज्यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एका एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक धावा केल्या आहेत.
३) विराट कोहली –
२०१६ साली ऑस्ट्रेलियन भूमीवर खेळवल्या गेलेल्या एकदिवसीय मालिकेत भारताला ४-१ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र विराट कोहलीसाठी ही मालिका धावांच्या दृष्टीने यशदायी ठरली होती. ह्या मालिकेत विराटने ५ सामन्यांत ७६ च्या सरासरीने ३८१ धावा काढल्या होत्या. ज्यात २ शतकांसह ११७ धावांच्या सर्वोच्च खेळीचा समावेश होता.
२) रोहित शर्मा –
रोहित शर्माने भारतासाठी २०१३ पासून एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीवीर म्हणून फलंदाजी करण्यास सुरुवात केली. त्या स्थानावर त्याने भारतीय संघासाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. २०१६ च्या ऑस्ट्रेलिया दौर्यातही रोहितने धावांचा पाऊस पाडला होता. त्यावेळी खेळवण्यात आलेल्या एकदिवसीय मालिकेत रोहित भारताकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. ह्या मालिकेत त्याने ५ सामन्यांत तब्बल ११० च्या सरासरीने ४४१ धावा लुटल्या होत्या. ह्याच मालिकेत त्याने खेळलेली नाबाद १७१ धावांची खेळी आजही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे.
१) रोहित शर्मा –
२०१३ साली भारतात खेळवण्यात आलेली भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका आजही अनेकांना रोहित शर्मासाठी लक्षात असेल. ह्याच मालिकेत रोहित शर्माने त्याच्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक झळकावले होते. फलंदाजीला अनुकूल असलेल्या सपाट खेळपट्टींवर खेळवल्या गेलेल्या सामन्यांमुळे ह्या मालिकेत दोन्ही संघांनी धावांचे डोंगर उभारले होते. रोहितने सुद्धा ह्या खेळपट्ट्यांचा फायदा उठवत ६ सामन्यांत ४८१ धावा करत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरण्याचा मान पटकावला होता.
आगामी ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकणार नसल्याने कांगारूंच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या ताफ्यासमोर अधिकाधिक धावा करण्याची जबाबदारी विराटसह अन्य फलंदाजांवर असेल.
महत्त्वाच्या बातम्या –
“मी फॉर्ममध्ये आलोय !” ऑस्ट्रेलियन फलंदाजाचे भारतीय संघाला आव्हान
“युवा खेळाडूंमध्ये स्पार्क दिसला नाही”, धोनीच्या वक्तव्यावर ऋतुराज गायकवाडने सोडले मौन
धक्कादायक ! रोहितच्या घरात कोरोनाचा शिरकाव; वडिलांना झालीय लागण ?
ट्रेंडिंग लेख –
कसोटीतील हे तीन दिग्गज कधीच दिसणार नाहीत भारताच्या निळ्या जर्सीत?
ऑस्ट्रेलियात सर्वाधिक शतके ठोकणारे ‘तीन’ विदेशी धुरंदर, दोन भारतीय कर्णधारांचा समावेश
बॅगी ग्रीन- कहाणी जगातील सर्वात प्रसिद्ध ऑस्ट्रेलियन क्रिकेट कॅपची