---Advertisement---

विश्वचषकचं आठवला; दशकानंतर कॅप्टनकूल धोनीचा ‘जादुई’ षटकार, जुन्या आठवणी झाल्या ताज्या

On: शनिवार, ऑक्टोबर 2, 2021 12:30 PM
---Advertisement---

आयपीएलच्या मैदानात गुरुवारी (३० सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने सामन्याचा शेवट षटकार मारून केला आणि चेन्नईला सामन्यात विजय मिळवून दिला. या सामन्यात चेन्नईने हैदराबादवर ६ विकेट्सने विजय मिळवला. या विजयासह चेन्नईने विक्रमी ११ व्यांदा प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे. धोनीने सामन्याचा शेवट षटकाराने केल्यामुळे चाहत्यांना १० वर्षांपूर्वीचा, २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील एक क्षण आठवला आहे.

धोनीने सामन्याचा शेवट षटकाराने केल्यामुळे चाहत्यांच्या २०११ विश्वचषकाच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. धोनीने या सामन्यात शेवटच्या षटकात सिद्धार्थ कौलला ९६ मीटरचा जबरदस्त षटकार मारला आहे. अगदी अशाच प्रकारे धोनीने श्रीलंकेविरुद्ध २०११ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातही षटकार मारला होता आणि भारतीय संघाने त्यांच्या इतिहातील दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता. चाहते आता सोशल मीडियावर धोनीच्या या षटाकराची आणि विश्वचषकातील षटकारीची तुलनाही करू लागले आहेत.

हैदराबादविरुद्धच्या सामन्या शेवटच्या षटकात चेन्नईला विजयासाठी ३ धावांची आवश्यकता होती आणि स्ट्राईकवर अंबती रायडू होता. त्याने षटकातील पहिला चेंडू डाॅट खेळला. दुसऱ्या चेंडूवर त्याने एक धाव घेतली आणि धोनीला स्ट्राईक दिली. त्यानंतर चेन्नईला विजयासाठी ४ चेंडूत २ धावांची आवश्यकता होती. कौलच्या षटकातील तिसरा चेंडू डाॅट गेला आणि हैदराबादच्या विजयाच्या अपेक्षा वाढल्या. अशातच षटकातील चौथ्या चेंडूत धौनीने एक जबरदस्त षटकार मारला आणि चेन्नईला हंगामातील ९ वा विजय मिळवून दिला. हैदराबादविरुद्ध मिळवलेल्या या विजयानंतर आयपीएल २०२१ च्या प्लेऑफमध्ये पोहोचणारा चेन्नई पहिला संघ बनला आहे.

https://twitter.com/ShivNagre3/status/1443794748687273986?s=20

https://twitter.com/RuturajFC/status/1443763644420874240?s=20

https://twitter.com/Thyview/status/1443632540586180609?s=20

https://twitter.com/TrollMSDHaterz/status/1443639208342523918?s=20

दरम्यान, हा सामना शारजाह क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला होता. चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हैदराबादने प्रथम फलंदाजी करत ७ विकेट्सच्या नुकसानासह २० षटकात १३४ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात चैन्नईने त्यांचे आव्हान १९.४ षटकात आणि ६ विकेट्स राखून गाठले होते.

या विजयासह चेन्नई संघ गुणतालिकेत ११ पैकी ९ सामन्यांमध्ये विजय मिळवत पहिल्या स्थानावर कायम आहे आणि प्लेऑफमध्ये पोहचला आहे. तर दुसरीकडे हैदराबादने ११ पैकी ९ सामने गमावले असून गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर कायम आहेत. हैदराबादच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आधीच संपल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई वि. दिल्ली सामन्यासाठीची ‘ड्रीम 11’ टीम, यांच्यावर पैसा लावल्यास मालामाल होण्याची संधी!

बाद की नाबाद? निर्णायक क्षणी तिसऱ्या पंचांचा विवादित निर्णय, केकेआरसोबत अन्याय झाल्याची चर्चा

धोनीने पंचांचाच काढला घाम! मुद्दाम घेतला चुकीचा रिव्ह्यू अन् ड्रेसिंग रूमकडे मारली कूच

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---