क्रिकेट विश्वात हार्दिक पंड्याचे खूप मोठे नाव बनले आहे. त्याच्या क्रिकेट खेळण्याविषयी जेवढी चर्चा असते तेेवढीच चर्चा त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगतानाही असते. आज आम्ही तुम्हाला त्याच्या पहिल्या क्रिकेट सामन्याशी संबंधित एक किस्सा सांगणार आहोत, जो स्वत: क्रिकेटपटू हार्दिक पंड्याने एका मुलाखतीत सांगितला आहे.
खरं तर हा किस्सा एमएस धोनी भारतीय संघाचा कर्णधार असतानाच्या वेळेचा आहे. हार्दिकने सांगितले की धोनी त्याच्या पहिल्याच सामन्यात त्याच्यावर थोडा रागावला होता. जेव्हा या मुलाखती दरम्यान हार्दिकला तुझा पहिला सामना कोणत्या स्टेडियमवर झाला होता? ब्रिस्बेन की सिडनी असे विचारले असता त्याने त्वरित – अॅडलेड असे उत्तर दिले होते.
त्यानंतर हार्दिक म्हणाला की, “त्यादिवशी मी सर्वांना भेटलो. तेव्हा मी एक शांत आणि सभ्य मुलगा होतो. जेव्हा जेव्हा मला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली तेव्हा मी आक्रमकपणे गोलंदाजीे केली. मी पहिल्याच षटकात पाच वाइड चेंडू टाकले होतेे. ”
त्यानंतर तो म्हणाला की, “मी माझ्या पहिल्या षटकात 21 धावा दिल्या होत्या. मला पहिल्यांदा स्वत:ल शून्य असल्याची जाणीव झाली. मला वाटले आता माझे करिअर संपले आहे. यानंतर माही म्हणाला तुला अजून एक ओव्हर टाकायची आहे. आपण गेल्या वेळेस केलेली चूक शेवटची चूक आहे, असे समज. तेव्हा मला कळले की एमएस धोनी खरोखरच एक दिग्गज आहे.”
हार्दिकने ऑस्ट्रेलियाविरुद्ध २०१६ साली टी२० सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. आता पंड्या आणि धोनी हे मैदानातच नाही तर मैदानाबाहेरही चांगले मित्र आहेत. अनेकदा ते दोघे कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई इंडियन्सचा आश्चर्यकारक निर्णय, केवळ दोन प्रथम श्रेणी सामने खेळलेल्या खेळाडूची संघात केली निवड
अय्यर नसताना रहाणेच्या हाती दिल्ली कॅपिटल्सच्या नेतृत्त्वाची धुरा, सोशल मीडियावर मागणीला जोर