मंगळवारी (१३ एप्रिल) चेन्नई येथे मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात झालेला सामना अतिशय चुरशीचा ठरला. प्रथम फलंदाजी करताना मुंबईच्या फलंदाजांनी कोलकाताच्या गोलंदाजांपुढे नांग्या टाकल्या. २० षटकात अवघ्या १५२ धावा करत त्यांचा पूर्ण संघ गारद झाला. प्रत्युत्तरात कोलकाताच्या सलामीवारांनी संघाला जबरदस्त सुरुवात करुन दिली. परंतु अखेरच्या ५ षटकात मुंबईने सामन्यात पुनरागमन केले आणि १० धावांनी सामना खिशात घातला.
सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या संघाच्या विजयाबाबत विस्तारमध्ये सांगितले आहे.
गोलंदाजांना दिले सामना विजयाचे श्रेय
पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमद्ये बोलताना रोहित म्हणाला की, “आम्ही दमदार पुनरागमन केले. प्रत्येक खेळाडूने उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळेच हे शक्य झाले. सहसा इतके चुरसीचे सामने पाहायला मिळत नाहीत. या सामना विजयानंतर आमचा आत्मविश्वास अजून उंचावला आहे.”
“प्रतिस्पर्धी कोलकाता संघाने पावरप्लेमध्ये अतिशय चांगली फलंदाजी केली होती. परंतु पुढे राहुल चाहरने संघाला अतिशय महत्त्वपुर्ण विकेट्स मिळवून दिल्या. अंतिम षटकात कृणाल पंड्याचीही गोलंदाज अत्यंत प्रशंसनीय राहिली. आमच्या सांघिक कामगिरीमुळेच आम्ही जिंकलो. परंतु मी याचे पूर्ण श्रेय संघातील गोलंदाजांना देऊ इच्छितो,” असे रोहित पुढे म्हणाला.
सूर्यकुमार यादवचा शानदार फॉर्म अजूनही कायम
पुढे चेन्नईच्या खेळपट्टीविषयी बोलताना रोहित म्हणाला की, “असे म्हटले जाते की चेन्नईच्या खेळपट्टीवर फलंदाज पहिल्याच चेंडूपासून फटकेबाजी करु शकत नाही. तुम्हाला या मैदानावर फलंदाजीस जाण्यापुर्वी निश्चित योजना बनवावी लागते. आम्ही अपेक्षेपेक्षा १५-२० धावा कमी केल्या. आम्हाला डेथ ओव्हर्समधील फलंदाजीकडे लक्ष देण्याची जास्त गरज आहे. परंतु सूर्यकुमार यादवने या मैदानावरही त्याच्या फलंदाजीची लय कायम राखली. तो अतिशय निडरपणे फलंदाजी करतो. याचा आम्हाला नेहमीच फायदा होत असतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
अरेरे! पहिला चेंडू टाकण्याआधीच रोहितचा पाय मुरगळला अन् वेदनेने मैदानावर व्हिवळत बसला, पाहा व्हिडिओ
हाताचे बोट तुटलेले असूनही केकेआरच्या गोलंदाजाने रोहित-इशानला धाडलं तंबूत, जाणून घ्या कसा झालता अपघात
रोहितचे अर्धशतक हुकले पण केला ‘हा’ मोठा कारनामा; आता केवळ विराट आणि रैना आहेत पुढे