सध्या भारतीय संघ ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंड दौऱ्यावर आहेत. यातील २ सामन्यानंतर अनेक आजी-माजी दिग्गज खेळाडूंनी यावर वक्तव्य केले आहे. यात काहींनी इंग्लंडवर टीका केली, तर काहींनी भारतीय संघाचे तोंड भरून कौतुक केले. तर असेही काही मंडळी होते, ज्यांनी वैयक्तिकरित्या खेळाडूंचे देखील कौतुक केले आहे.
यातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार नासिर हुसेनने विराट कोहलीचे कौतुक केले आहे. नासिरच्या मते, विराट कोहली कसा कर्णधार आहे, जो क्रिकेटमधील आपला जोश आणि आक्रमक स्वभावाने भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. सध्याचा भारतीय संघ जुन्या भारतीय संघा सारखा नाही. ज्याला कोणीही डीवचू शकत होते. सध्याचा भारतीय संघ उत्तर देण्यात देखील माहीर आहे.
डेली मेलच्या एका स्तंभात याबाबत नासिर हुसेनने लिहिले, “विराट कोहली सध्याच्या काळातला सर्वात उत्कृष्ट खेळाडू आहे. जो भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे. भारतीय संघाच्या खेळाडूंना खास करून गोलंदाजी विभागाला एक आक्रमक कर्णधार हवा, जसा की विराट कोहली आहे. असेच काहीसे त्याने लॉर्ड्सच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केले. सध्याचा भारतीय संघ जुन्या भारतीय संघ सारखा नाही ज्याला कोणीही डीवचू शकत होते.”
पुढे नासिर म्हणाला, “हा भारतीय संघ ऑस्ट्रेलिया सारख्या खेळाडूंना व तिथल्या प्रेक्षकांना देखील जुमानत नाही. ज्यावेळी एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेन भारतीय खेळाडूंना म्हणाला होता, गाबाच्या कसोटी सामन्यासाठी तुम्ही वाट पाहा. या गोष्टीने भारतीय संघाला आणखीनच उत्तेजित केले. तसेच इंग्लंडच्या प्रशिक्षकांनी देखील म्हटले होते, की आम्ही मालिकेतील उर्वरित सामन्यांमध्ये भारतीय संघाला सडेतोड उत्तर देणार, तर या गोष्टीमुळे देखील भारतीय संघाला आणखीन चांगले खेळण्यासाठी प्रेरित केले.”
“तसेच विराट कोहलीचा आक्रमकपणा विरोधी संघावर वरचढ ठरतो. तो ज्या कोणत्याही संघासोबत खेळतो, नेहमी याच स्वरूपाने खेळतो. मला माहितीये अनेक लोकांना तो आवडत नाही. मात्र, याने त्याला काहीही फरक पडत नाही. तो नेहमीच काहीतरी जास्त करण्याचा प्रयत्न करत असतो. याबाबत मी मागेही म्हणलो होतो की, मला खेळाडूंचा जोश आणि एका मर्यादेतील आक्रमकपणा आवडतो.”
“मला विराट कोहलीमध्ये आजचा भारत दिसतो. तो एक असा खेळाडू आहे, ज्याला आपण रोखू शकत नाही. कित्येक वेळा तर सामन्याच्या पंचांना देखील यामध्ये मध्यस्थी करून त्याला सांगावे लागते की, तुम्ही तुमच्या मनमानीने खेळ नाही चालवू शकत,” असेही नासिर म्हणाला.
दरम्यान, इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील २ कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाने ०-१ ने आघाडी मिळवली आहे. तर भारतीय संघ तिसऱ्या कसोटी सामन्यासाठी लीड्सच्या हेडिंग्ले मैदानात देखील पोहोचला आहे. इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्ट पासून हेडींग्लेच्या मैदानावर सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
–दहा वर्षानंतर पुनरागमन अन् १० सामन्यातच दाखवला जलवा, कामगिरी पाहून तुम्हालाही फुटेल घाम
–भारतीय क्रिकेटर्सनी धरली अमेरिकेचे वाट! उन्मुक्त, मिलिंदनंतर आता मुंबईच्या ‘या’ खेळाडूचाही मोठा निर्णय
–“भारताला हार्दिककडून खूप अपेक्षा, मात्र त्याने…”