यंदाच्या विश्वचषकाला 2 जून पासून सुरुवात झाली आहे. त्याआधी भारताचा पहिला सराव सामना बांग्लादेश विरुध्द 1 जून रोजी पार पडला. न्यूयाॅर्क येथील नासाउ क्रिकेय स्टेडियम येथे हा सामना झाला. टीम इंडीयाने यासामन्यावर 60 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाच्या या फलंदाजीच्या कामगिरीवर भारताचा माजी खेळडू नवज्योत सिंग सिध्दूनी भाष्य केले आहे.
बांग्लादेश विरुध्दच्या सराव सामन्यात टीम इंडीयाने फलंदाजाच्या क्रमवारीत चांगलेच बदल झाले. संजूने सलामी केली तर यशस्वी जयस्वालला संघात स्थानही मिळाले नाही. तर रिषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर आला. यामुळे टीम आगामी विश्वचषकात कोणत्या टीम काॅम्बिनेशन खेळणार हे पाहणं योग्य राहील.
स्टार स्पोर्ट्सवर समालोचन करताना नवज्योत सिंग सिध्दू म्हणाले “हे पाहा आज रोहित सोबत संजूने सालामी केली हा नवा प्रयोग करुन टीम इंडीयानी स्पष्ट केले आहे की सलामी जोडी नक्की बदल होणार आहे. जर विश्वचषकात रोहित सोबत जयसवाल सलामी करणार असता तर आपल्याला आज पहायला मिळाले असते पण तसे झाले नाही.”
सिध्दू पुढे म्हणाले ” मला नक्की खत्री आहे की आता रोहित आणि विराट संघासाठी सलामी करणमार आहेत. आणि त्यासोबत पंत अकरा मध्ये खेळणार पंतने आपल्या फलंदाजीत आक्रमकता दाखवली आहे. पण संजूसाठी अकरामध्ये जागा मिळणे अवघड आहे. सूर्यकुणार यादव तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. जर टीस इंडीया या सालामी जोडीसह मैदानात उतरला तर नक्कीच भारतास त्याचा फायदा होईल.”
बांग्लादेश विरुद्ध झालेल्या सराव सामन्यात भारताने 60 धावांनी विजय मिळवला प्रथम फलंदाजी करताना टीम इंडीयाने 20 षटकात 5 विकेट्स गमावून 182 धावा केल्या होत्या. धावांचा पाठलाग करताना बांग्लादेशला 122 धावांपर्यंत मजल मारता आली. गोलंदाजीत अर्शदीप सिंह आणि शिवम दुबेने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.
महत्तवाच्या बातम्या-
‘रोहित ब्रिगेड’ला पाकिस्तानच्या ‘या’ 5 खेळाडूंपासून सावध राहावं लागेल, भारताविरुद्ध आहे उत्कृष्ट रेकॉर्ड
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्शने परिधान केली युगांडा संघाची जर्सी! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
टी20 विश्वचषकातील सामन्यापूर्वी भारताच्या ‘या’ दिग्गजाचा पाकिस्तानला टोला!