सोमवारी (२८ सप्टेंबर) इंडियन प्रीमियर लीग २०२०चा दहावा सामना पार पडला. दुबई येथे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात खेळण्यात आलेला हा खूप रोमांचक झाला. या सामन्यात बेंगलोरने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात २०१ धावा केल्या. मुंबईने बेंगलोरच्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना २० षटकात २०१ धावा केल्या आणि सामना बरोबरीत सुटला.
त्यामुळे सुपर ओव्हर खेळण्यात आली. मुंबईने सुपर ओव्हरमध्ये सुरुवातीला फलंदाजी करताना १ विकेट गमावत ७ धावा केल्या. त्यानंतर बेंगलोरने १० धावा करत सामना खिशात घातला. यासह विराट हा सुपर ओव्हरमध्ये आपल्या संघाला तब्बल २ आयपीएल सामने जिंकून देणाऱ्या निवडक कर्णधारांच्या यादीत सहभागी झाला आहे.
यापुर्वी त्याने २०१३ साली दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हा कारनामा केला होता. त्यावेळी दिल्ली संघाने प्रथम फलंदाजी करताना १५२ धावा केल्या. बेंगलोरने दिल्लीच्या १५३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना २० षटकात १५२ धावा करत सामना बरोबरीत सोडला होता. त्यानंतर सुपर ओव्हरमध्ये बेंगलोरचा गोलंदाज रवी रामपॉलने २ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला होता.
विराटव्यतिरिक्त दिल्लीचा कर्णधार श्रेयश अय्यर, मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आणि डेक्कन चार्जर्सचा कर्णधार कुमार संगकारा यांनी हा पराक्रम केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
-एबी केवळ पैशांसाठी आयपीएलमध्ये करतोय विकेटकीपिंग, पाहा कुणी केलाय ‘हा’ गंभीर आरोप
-“दुसऱ्या डावात मैदान लहान झालं असेल,” तेवतियाच्या खेळीनंतर सचिनने ‘या’ समालोचकाला केले ट्रोल
-इकडे त्याने ५ षटकार ठोकले आणि तिकडे संघाने केला खास सन्मान
ट्रेंडिंग लेख-
-IPL २०२०: ‘हे’ ५ धडाकेबाज फलंदाज करू शकतात ५०० पेक्षा जास्त धावा
-यंदा आयपीएलमधून भारताच्या टी२० विश्वचषक संघात स्थान मिळवू शकणारे ५ भारतीय गोलंदाज
-IPL २०२०: पहिल्या १० सामन्यांमध्ये ‘या’ फलंदाजांनी साकारलीय सर्वोच्च वैयक्तिक खेळी