भारताचा अनुभवी यष्टीरक्षक पार्थिव पटेलने (Parthiv Patel) रिषभ पंतबद्दल (Rishabh Pant) एक मोठे भाष्य केले आहे. आता युवा खेळाडूंकडे आयपीएलच्या माध्यमातून स्वत: ला पुढील सामन्यांसाठी मजबूत बनविण्यासाठी चांगली संधी आहे, असे पार्थिव पटेल म्हणाला.
पंतबद्दल बोलताना पार्थिव म्हणाला की, “जेव्हा तुम्ही कमी वयात भारतासाठी खेळता, तेव्हा सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेच की स्वत: बद्दल होणाऱ्या चर्चांमध्ये न पडणे. बाहेरून येणाऱ्या सूचनांबद्दल जास्त वाचू नये. पंतला निवडकर्ता आणि संघ व्यवस्थापकांचे समर्थन मिळाले आहे. पंतला फक्त तिथे जाऊन स्वत: ला सिद्ध करण्याची गरज आहे.”
“मी जेव्हा क्रिकेट खेळायला सुरूवात केली तेव्हा आमच्याकडे आयपीएल (IPL) नव्हते. आम्हाला आयपीएलमधील दबावाच्या परिस्थितीमार्फत स्वत: ला सिद्ध करण्याची संधी नव्हती,” असेही पार्थिव यावेळी म्हणाला.
“भारतीय संघात येण्यापूर्वी दिग्गज खेळाडूंसोबत खेळण्याचा फायदा आता युवा खेळाडूंना आहे. त्यामुळे पंतवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील दबावाचा जास्त फरक पडत नाही. परंतु, जेव्हा तुमच्याकडून चांगली कामगिरी होत नाही, तेव्हा आपल्यावर टीकाही तेवढ्या वेगाने होत असतात,” असे पंतबद्दल बोलताना पार्थिव म्हणाला.
“हे महत्त्वपूर्ण आहे की तुमच्याबद्दल दिल्या जाणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियांचा प्रभाव तुमच्यावर होऊ दिला नाही पाहिजे,” असेही पार्थिव यावेळी म्हणाला.
यावेळी पार्थिवने वृद्धिमान साहाची प्रशंसा करताना त्याला जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक म्हटले आहे.
“ज्या प्रकारे साहा यष्टीरक्षण करतो, झेल घेतो, ते पाहता तो जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. जिथपर्यंत क्रिकेटची गोष्ट आहे साहाच्या तुलनेत दुसरा यष्टीरक्षक कोणीही नाही. सर्वांना माहिती आहे की तो सर्वोत्कृष्ट आहे,” असेही पार्थिव म्हणाला.
जसप्रीत बुमराहने केले क्रिकेटजगतातील सर्वात मोठे खळबजनक विधान
वाचा????https://t.co/eUp0UzjMQG????#म #मराठी #Cricket @Jaspritbumrah93— Maha Sports (@Maha_Sports) January 3, 2020
विश्वचषक विजेत्या शुबमन गिलची अंपायरला शिवीगाळ? मॅचवर झाला असा परिणाम
वाचा????https://t.co/dF7Y2SIalc????#म #मराठी #Cricket #RanjiTrophy @RealShubmanGill— Maha Sports (@Maha_Sports) January 3, 2020