लंडनच्या ओव्हल मैदानावर इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा कसोटी सामना सुरू आहे. या मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्यात, इंग्लंड संघाने भारतीय संघाला १ डाव आणि ७६ धावांनी पराभूत केले होते. या पराभवानंतर चौथ्या कसोटी सामन्यात आर अश्विनला संधी दिली जाईल, असा अंदाज व्यक्त केला गेला होता. परंतु, चौथ्या कसोटी सामन्यातही त्याला संधी न दिल्याने अनेक दिग्गजांनी आणि क्रिकेट चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
दरम्यान, अश्विनच्या पत्नीने एक व्हिडिओ शेअर करत अप्रत्यक्षरीत्या संघ व्यवस्थापक आणि कर्णधार कोहलीच्या निर्णयाला टोला मारला असल्याची चर्चा होत आहे.
आर अश्विन हा भारतीय संघातील दिग्गज गोलंदाजांपैकी एक आहे. तसेच त्याच्या नावे अनेक मोठ्या विक्रमांची नोंद आहे. परंतु, इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेत त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आर अश्विनला संघात स्थान न दिल्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी आणि क्रिकेट चाहत्यांनी विराट कोहलीच्या निर्णयावर प्रश्न उपस्थित करायला सुरुवात केली आहे.
चौथ्या कसोटी सामन्यापूर्वी ईशांत शर्मा ऐवजी आर अश्विनला संधी देण्यात येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. परंतु, या सामन्यात ईशांत शर्मा ऐवजी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली.
आर अश्विनची पत्नी प्रीथी ही सोशल मीडियावर प्रचंड ॲक्टीव्ह असते. तिने चौथा कसोटी सामना सुरु असताना एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडियोमध्ये अश्विन आणि प्रीथीची मुलगी स्टँड्समध्ये उभी राहुन दुर्बीनच्या साहाय्याने सामना पाहताना दिसून येत आहे. या व्हिडीओवर कॅप्शन देत प्रीथीने लिहिले की, “आर अश्विनला शोधत आहे.” या व्हिडिओतून प्रीथीने अप्रत्यक्षरित्या अश्विनची निवड न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली असल्याचे अनेकांनी म्हटले आहे.(Prithi shares a sarcastic clip after husband’s omission from 4th test)
https://twitter.com/prithinarayanan/status/1433408585074200587?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1433408585074200587%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fcircleofcricket.com%2Fcategory%2Fengvind2021%2F68743%2Feng-v-ind-2021-watch-looking-for-ashwin-prithi-shares-a-sarcastic-clip-after-husbands-omission-from-4th-test
आर अश्विनने आपला शेवटचा कसोटी सामना विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात खेळला होता. या सामन्यात त्याला ३ गडी बाद करण्यात यश आले होते. तसेच ओव्हल कसोटी सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, भारतीय संघाचा पहिला डाव १९१ धावांवर संपुष्टात आला आहे. भारतीय संघाकडून शार्दुल ठाकूरने सर्वाधिक ५७ धावांची खेळी केली. तर, कर्णधार कोहलीने ५० धावांचे योगदान दिले. तसेच पहिल्या दिवसाखेर इंग्लंडनेही ३ गडी गमावत ५३ धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
जडेजाला फलंदाजीत बढती दिल्याने तब्बल १३ वर्षांनी घडली ‘ती’ घटना, गांगुली होता शेवटचा फलंदाज
वोक्सच्या चेंडूने घेतली जडेजाच्या बॅटची कड अन् चेंडू विसावला थेट रुटच्या हातात, पाहा भन्नाट झेल
‘हे’ ३ विदेशी खेळाडू आयपीएलच्या कोणत्याही संघासाठी ठरतील हुकुमी एक्के, ज्यांना मिळायला हवी एक संधी