संपुर्ण नाव- केदार महादेव जाधव
जन्मतारिख- 26 मार्च, 1985
जन्मस्थळ- पुणे, महाराष्ट्र
मुख्य संघ- भारत, चेन्नई सुपर किंग्स, दिल्ली डेअरडेविल्स, भारत अ, भारत ब, इंडिया ब्ल्यू, इंडिया इमर्जिंग टीम, इंडिया ग्रीन, भारतीय बोर्ड अध्यक्षयी एकादश, कोची टस्कर्स केरळ, महाराष्ट्र, महाराष्ट्र एकादश, शेष भारतीय संघ, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि पश्चिम विभाग
फलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फलंदाज
गोलंदाजीची शैली- उजव्या हाताचा फिरकी गोलंदाज
आंतरराष्ट्रीय वनडे पदार्पण- भारत विरुद्ध श्रीलंका, तारिख – 16 नोव्हेंबर, 2014, ठिकाण – रांची
आंतरराष्ट्रीय टी20 पदार्पण- भारत विरुद्ध झिम्बाब्वे, तारिख – 17 जुलै, 2015, ठिकाण – हरारे
आंतरराष्ट्रीय वनडे कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 73, धावा- 1389, शतके- 2
गोलंदाजी- सामने- 73, विकेट्स- 27, सर्वोत्तम कामगिरी- 3/23
आंतरराष्ट्रीय टी20 कारकिर्द-
फलंदाजी- सामने- 9, धावा- 122, शतके- 0
थोडक्यात माहिती-
-केदार जाधव हा मुळात सोलापूरमधील माढा तालुक्यातील जाधववाडी येथील आहे. वडिल महादेव आणि आई मंदाकिनी यांच्या 4 मुलांपैकी तो सर्वात लहान मुलगा आहे. त्याचे वडील हे महाराष्ट्र राज्य इलेक्ट्रीसिटी बोर्डचे कर्मचारी होते. ते 2003 मध्ये निवृत्त झाले.
-केदार आता पुण्यातील कोथरूड भागात राहतो. त्याने तेथील पिवायसी हिंदू जिमखाना येथून क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. सुरुवातीला तो रेनबो क्रिकेट क्लबमधील टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धामध्ये खेळत होता.
-2004मध्ये केदारची 19 वर्षांखालील महाराष्ट्र संघात निवड झाली होती.
-केदारने मार्च 2010मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध दिल्ली डेअरडेविल्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. यावेळी पदार्पणाच्या सामन्यातच त्याने 29 चेंडूत 50 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 5 चौकारांचा आणि 2 षटकारांचा समावेश होता. यामुळे तो सामनावीर बनला होता.
-2011मध्ये त्याला कोची टस्कर्स केरळने विकत घेतले होते. तेव्हा केदारने संपूर्ण हंगामात 6 सामने खेळले होते. 2013 हा संपूर्ण हंगाम त्याच्यासाठी अयशस्वी ठरला होता. त्यामुळे परत त्याने 2014ला दिल्ली डेअरडेविल्समध्ये प्रवेश केला आणि त्याही हंगामात तो चांगली कामगिरी करू शकला नाही. अखेर 2015मध्ये दिल्लीनेच त्याला 20 मिलीयनला विकत घेतले.
-2012मध्ये उत्तर प्रदेशविरुद्ध रणजी ट्रॉफी सामना खेळत असताना केदारने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतील पहिले त्रिशतक केले होते. यावेळी महाराष्ट्रकडून 327 धावा करत तो संघातील सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज ठरला होता.
-केदार देशांतर्गत क्रिकेटमध्ये महाराष्ट्र संघाकडून खेळत होता. 2013-14 या संपूर्ण रणजी ट्रॉफी हंगामात त्याने 1223 धावा केल्या होत्या. यात त्याच्या 6 शतकांचा समावेश होता. यासह तो संघातील सर्वाधिक धावा करणारा आणि रणजी ट्रॉफीच्या इतिहासात एका हंगामात सर्वाधिक धावा करणारा चौथा फलंदाज ठरला होता.
-केदारला 2013-14 मधील रणजी ट्रॉफीतील सर्वाधिक धावांसाठी माधवराव सिंधीया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
-2016 मध्ये केदारला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने आपल्या संघात सामाविष्ठ केले होते.
-जून 2014 मध्ये बांग्लादेश दौऱ्यावर केदारची पहिल्यांदा भारतीय संघात नियुक्ती झाली होती. मात्र यावेळी त्याला एकही सामन्यात खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्याच्या काही महिन्यानंतर नोव्हेंबर 2014ला केदारने श्रीलंकाविरूद्धच्या 5व्या वनडे सामन्यातून पदार्पण केले होते. यावेळी 24 चेंडूत 20 धावा करत तो यष्टीचीत झाला होता.
-वनडे पदार्पणानंतर चौथ्या डावात केदारने त्याचे पहिले वनडे शतक ठोकले होते. त्याच्यापुर्वी 5 डावात वनडे शतक करण्याचा विक्रम मनोज प्रभाकर आणि एमएस धोनीच्या नावावर होता. केदारचा विक्रम पुढे मनिष पांडेने मोडला.
-केदारने स्नेहल प्रमोद जाधव हिच्याशी लग्न केले. ती मुंबईत जन्मली आणि तिथेच वाढली. ती स्वावलंबी आणि मेहनती आहे. त्यांना 2015मध्ये कन्यारत्न प्राप्त झाले.