भारतीय संघाने इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत ३-१ ने विजय मिळवत मालिकेवर आपले नाव कोरले आहे. यासोबतच भारतीय संघ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे. यानंतर आता भारतीय संघासमोर टी-२० मालिका जिंकण्याचे आव्हान असणार आहे. या मालिकेसाठी संघात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यामध्ये वरुण चक्रवर्ती किंवा राहुल तेवतिया यांच्याजागी नव्या फिरकी गोलंदाजाला संघात समाविष्ट करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
शुक्रवारपासून (१२ मार्च) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्या टी-२० सामन्याला प्रारंभ होणार आहे.तत्पुर्वी वरुण चक्रवर्ती आणि राहुल तेवतिया यांच्या फिटनेसबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. त्यामुळे फिरकीपटू राहुल चाहर याला संघात स्थान दिले जाऊ शकते.
राहुल चाहरला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत स्टॅन्डबाय म्हणुन संधी देण्यात आली होती. परंतु त्याला खेळायची संधी मिळाली नाही. तसेच तो संघासोबत असल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून बायो बबलमध्येच आहे. सोमवारी (९ मार्च) झालेल्या भारतीय संघाच्या सराव सत्रात देखील तो उपस्थित होता. त्यामुळे जर वरुण चक्रवर्ती आणि राहुल तेवतिया टी२० मालिकेपुर्वी फिट नसतील; तर राहुल चाहरला संघात संधी देण्याबाबत संघ व्यवस्थापन नक्कीच विचार करेल.
तामिळनाडू संघाचा फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्ती याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाण्यासाठी देखील संघात निवड करण्यात आली होती. परंतु दुखापतीमुळे त्याला माघार घ्यावी लागली होती. तसेच एनसीएमध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये चक्रवर्तीसोबत आणि राहुल तेवतियाही अपयशी ठरला होता.
राहुल तेवतिया सध्या अहमदाबादमध्ये विलग्नवासात आहे. तसेच त्याला सोमवारी संघासोबत सराव करताना देखील पाहिले गेले होते. परंतु चक्रवर्तीला एनसीएमध्ये आपल्या फिटनेस वर काम करण्यासाठी सांगितले गेले आहे. त्यामुळे राहुल चाहरला त्याच्याजागी संघात समाविष्ट करून घेण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
टीम इंडियाला मोठा धक्का! ‘हा’ स्टार गोलंदाज पहिल्या टी२० सामन्यातून बाहेर? वाचा कारण
टी२० क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून विराट-रोहित एक पाऊल दूर, कोण मारणार बाजी?
आयपीएल २०२१: जेतेपद पटकावण्यासाठी ‘या’ संघात होणार चढाओढ, अंतिम फेरीचे असतील प्रमुख दावेदार