‘ऑपरेशन सिंदूर’ नंतर, आयपीएल 2025चा उर्वरित हंगाम पुन्हा एकदा रंगणार आहे. (17 मे) रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स (RCB vs KKR) यांच्यात सामना होणार आहे. हा सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. पण सामन्यापूर्वीच क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे, कारण या सामन्यावर पावसाचे सावट आहे. उद्या शनिवारी (17 मे) होणाऱ्या आरसीबी विरुद्ध केकेआर सामन्यात पाऊस पडू शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे.
जर बंगळुरू आणि कोलकाता यांच्या सामन्यात पाऊस पडला तर हा सामना रद्द होऊ शकतो. यानंतर, दोन्ही संघांना 1-1 गुण दिले जाऊ शकतात. जर थोड्या काळासाठी पाऊस पडला तर या सामन्यातील षटकांची संख्या कमी केली जाऊ शकते. मर्यादित षटकांचा सामना आयोजित करून कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना देखील निश्चित केला जाऊ शकतो.
आरसीबी-केकेआर सामन्यात जोरदार वादळ येऊ शकते. शनिवारी (17 मे) संध्याकाळपासून उद्या रात्री उशिरापर्यंत बंगळुरूमध्ये हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर कर्नाटकात काही ठिकाणी मुसळधार वादळ आणि गारपीट होण्याची शक्यता आहे.
IPL 2025 RCB vs KKR match at Chinnaswamy stadium, Bengaluru weather
— Karnataka Weather (@BengaluruRains_) May 16, 2025
Bangalore has a very good chance to see moderate to heavy intense thunderstorms accompanied by hailstorms at isolated places tomorrow b/w evening to late night#BengaluruRains #BangaloreRains #RCBvKKR #RCBvsKKR pic.twitter.com/JY3xg9YPrN
जर कोलकाता आणि बंगळुरू यांच्यातील सामना पावसामुळे वाया गेला तर केकेआरला अडचणींना सामोरे जावे लागू शकते. कोलकाता चिन्नास्वामी मैदानावर आपला 13वा सामना खेळेल, जर हा सामना रद्द झाला तर केकेआरला एक गुण मिळवून 12 गुण मिळतील. तर कोलकात्यासाठी फक्त एक सामना शिल्लक राहील आणि शेवटचा सामना जिंकल्यानंतरही केकेआरला फक्त 14 गुण मिळू शकतील. त्यामुळे केकेआरचे प्लेऑफचे स्वप्न भंगू शकते.






