भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या त्याच्या करकिर्दीतील सर्वात खराब फॉर्ममध्ये आहे. आयपीएल २०२२ मध्येही त्याची बॅट अद्याप कमाल करू शकली नाहीय. मंगळवारी (१९ एप्रिल) लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात विराट शून्य धावांवर बाद झाला. त्यानंतर भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक आणि विराटचे जुने सहकारी रवी शास्त्री यांनी त्याला क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. इंग्लंडचा माजी दिग्गज क्रिकेटपटू केवीन पीटरसनने देखील शास्त्रींच्या या भूमिकेचे समर्थन केले.
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये विराट कोहली (Virat Kohli) आरसीबीसोबत केवळ एका खेळाडूच्या रूपात जोडला गेला आहे. मागच्या हंगामानंतर त्याने कर्णधारपद सोडले होते. चाहत्यांना चालू हंगामात त्याच्याकडून खूप अपेक्षा होत्या, पण आतापर्यंत खेळलेल्या ७ सामन्यात केवळ दोन वेळा त्याने ४० पेक्षा जास्त धावांची खेळी केली आहे. याच पार्श्वभूमीवर रवी शास्त्री (Ravi Shastri) म्हणाले की, विराटने क्रिकेटमधून काही काळासाठी विश्रांती घेतली पाहिजे.
स्टार स्पोर्ट्सवर बोलताना शास्त्री म्हणाले की, “विराट मागच्या मोठ्या काळापासून क्रिकेट खेळत आहे. सध्या कोरोनामुळे काही वर्षांपासून क्रिकेट बायो-बबलमध्ये खेळले जात आहे. त्यामुळे विराट मानसिक स्वरूपात पूर्णपणे दमला आहे. जर कारकिर्दीतील राहिलेली वर्ष विराटचे चांगले क्रिकेट पाहायचे असेल, तर त्याला विश्रांती देणे गरजेचे आहे.”
“विराट कोहली सध्या खराब काळातून जात आहे. अजूनही त्याच्या कारकिर्दीतील ६-७ वर्ष राहिले आहेत. अशात भारतीय संघाला निश्चित करावे लागेल की, त्यांना विराटला अजून अडचणीत ढकलायचे आहे का, खासकरून तेव्हा जेव्हा बायो-बबलचा थकवा त्याच्यासाठी आधीच चिंतेचे बाब बनला आहे.” असेही शास्त्री पुढे बोलताना म्हणाले.
शास्त्रींच्या या वक्तव्यानंतर केविन पीटरसन (Kevin Pietersen) देखील व्यक्त झाला. पीटरसन म्हणाला की, “रवी शास्त्री १०० टक्के बरोबर बोलत आहेत. या खेळाडूला खूप गोष्टींना तोंड द्यावे लागत आहे. लग्नापासून ते मुलांपर्यंत, त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर मीडियामध्ये वक्तव्ये केली जातात. तो या काळाचा सर्वात मोठा स्टार आहे. विराटला काही काळासाठी विश्रांती घेण्याची खूप गरज आहे. त्याला सोशल मीडियापासून दूर राहावे लागेल आणि स्वतःला पुन्हा एकदा ऊर्जावान बनवावे लागेल.”
दरम्यान, विराटचे मागच्या दोन वर्षांतील प्रदर्शन पाहिले, तर ते खूपच निराशाजनक राहिले आहे. त्याने शेवटचे आंतरराष्ट्रीय शतक २०१९ मध्ये केले होते, त्यानंतर आजपर्यंत चाहत्यांना त्याचे शतक पाहायला मिळाले नाहीय. खराब फॉर्ममुळे विराटने भारतीय संघाचे कर्णधारपद देखील सोडले, पण अद्याप त्याच्या फॉर्ममध्ये अपेक्षित सुधारणा झाल्याचे दिसले नाहीय.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
विराटच्या ‘रनमशीन’ला झालंय तरी काय? तब्बल १०० सामने झाले तरी होईना शतक, पाहा आकडेवारी
IPL2022| दिल्ली वि. पंजाब सामन्यासाठीची ‘ड्रीम ११’, हे खेळाडू करून देऊ शकतात पैसा वसूल!
IPL 2022| लखनऊच्या पराभवानंतर केएल राहुलला मोठा दंड, तर स्टॉयनिसलाही फटकारलं, वाचा नक्की काय झालं