भारतीय संघाचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा याने क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. एकदिवसीय आणि टी२० क्रिकेटमध्ये रोहितची कामगिरी अप्रतिम राहिली आहे. आता त्याने कसोटी क्रिकेटमध्येही स्वत:ला सिद्ध केले आहे. त्याने मागच्या काही वर्षात भारताच्या कसोटी संघातील त्याचे स्थान निश्चित केले आहे. त्याने कसोटीत भारतामध्ये चांगले प्रदर्शन केले आहेच. त्याचसोबत विदेशातही उत्तम फलंदाजी करत त्याचे नाव केले आहे. याच हिटमॅनला चांगला कसोटीपटू बनवण्यासाठी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी दृढ संकल्प केला होता.
रोहित शर्माने कसोटी क्रिकेटमध्ये संघाच्या सलामीवीराच्या भूमिकेत चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या या कामगिरीचे श्रेय भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना जाते. बोरिया मजूमदार आणि कुषाण सरकार यांनी लिहिलेल्या ‘डाॅमिनेशन- ऍन अंफिनीश्ड क्वेस्ट’ या पुस्तकात खुलासा केला आहे की, रवी शास्त्रींनी कशाप्रकारे रोहित शर्माला चांगला कसोटी क्रिकेटपटू बनवण्यासाठी मेहनत घेतली आहे.
भारतातील २०१९ च्या देशांतर्गत सत्राच्या आधी रवी शास्त्रींनी म्हटले होते की, “जर रोहित शर्मा त्याच्या कार्यकाळात एक यशस्वी कसोटी फलंदाज झाला नाही; तर मी स्वत:ला अपयशी समजेन.” सध्याच्या परिस्थितीत आपण असे म्हणू शकतो की, रवी शास्त्रींनी रोहित शर्मासोबत कसोटी क्रिकेटमध्ये त्याची छाप सोडली आहे. रोहित शर्मा सध्या कसोटी क्रिकेटमध्ये सर्वोच्च क्रमवारीचा सलामीवीर आहे. त्याने जागतिक कसोटी क्रमवारीत ६ वे स्थान कायम राखले आहे.
रोहित सध्या इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करत आहे. त्याने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत संघाला चांगली सुरुवात करून दिली आहे. भारतीय संघाने लाॅर्ड्स स्टेडियमवरच्या दुसऱ्या सामन्यात इंग्लंडला १५१ धावांनी मात दिली. या सामन्याच्या पहिल्या डावात त्याने संघासाठी अप्रतिम ८३ धावा केल्या होत्या. दुसऱ्या सामन्यातील मिळालेल्या विजयानंतर भारतीय संघ मालिकेत १-० अशा आघाडीवर आहे. मालिकेतील तिसरा कसोटी सामना २५ ऑगस्टपासून हेडिंग्ले मैदानावर खेळला जाणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
चेतन सकारियाला फ्रँचायझीने विचारला घरचा पत्ता, गोलंदाजाचे उत्तर ऐकून पोट धरुन हसाल
मुंबई विरुद्ध ओमान संघातील पहिली टी२० लढत आजपासून, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक