इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील चौथा कसोटी सामना ओव्हलच्या मैदानावर सुरू आहे. ही मालिका सध्या १-१ च्या बरोबरीत आहे. त्यामुळे चौथा कसोटी सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा आहे. गेल्या तीन सामन्यात समाधानकारक कामगिरी करणाऱ्या रवींद्र जडेजाला या सामन्यातही संधी देण्यात आली आहे. दरम्यान, त्याच्या फलंदाजी क्रमामुळे एक अनोखा योगायोग झाला आहे.
जडेजाला चौथ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात ५ व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी बढती देण्यात आली होती. त्यामुळे, तो गेल्या १३ वर्षांत कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ५ व्या क्रमकांवर फलंदाजी करणारा भारताचा दुसराच डावखुरा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करणारा अखेरचा भारतीय डावखरी फलंदाज सौरव गांगुली होता.
गांगुली २००८ मध्ये कोलंबोच्या मैदानावर श्रीलंका संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पहिल्या दिवशी ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. या सामन्यात त्याने ५७ चेंडूंमध्ये ३५ धावांची खेळी केली होती.
DYK?
The last Indian left-hander to bat at #5 (before Ravindra Jadeja) on the 1st day of a Test match – Sourav Ganguly (35) at Colombo PSS on 8 August 2008.#INDvsEND #IndvEng#ENGvIND #EngvsInd— Mohandas Menon (@mohanstatsman) September 2, 2021
भारताचे प्रमुखे फलंदाज फ्लॉप
या सामन्यात कर्णधार रूटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय योग्य ठरवत इंग्लिश गोलंदाजांनी भारतीय संघाला १९१ धावांवर रोखले. सलामीवीर केएल राहुल १७ धावा करत माघारी परतला, तर रोहित शर्मा अवघ्या ११ धावा करत माघारी परतला होता. तसेच अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे देखील फ्लॉप ठरले आहेत. रहाणे १४ धावा करत परतला तर चेतेश्वर पुजाराला अवघ्या ४ धावा करता आल्या.
तसेच विराट कोहलीला या डावात चांगली सुरुवात मिळाली होती. परंतु त्याला देखील मोठी खेळी करता आली नाही. तो ५० धावा करत पॅव्हेलियनमध्ये परतला होता. त्यानंतर शार्दुल ठाकूरने ताबडतोड फलंदाजी करत भारताचा डाव सावरला. त्याने ३६ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ५७ धावा केल्या. त्यामुळे भारताला १९१ धावा करता आल्या. इंग्लंडकडून ख्रिस वोक्सने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर ऑली रॉबिन्सनने ३ विकेट्स घेतल्या. तसेच जेम्स अँडरसन आणि क्रेग ओव्हरटनने प्रत्येकी १ विकेट घेतली.
भारतीय गोलंदाजांची कमाल
भारताची फलंदाजी जरी अपयशी ठरली असली, तरी गोलंदाजांनी पहिल्या दिवशी कमाल केली आहे. भारताने इंग्लंडच्या पहिल्या दिवसाखेर ३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे इंग्लंडने पहिल्या दिवसाखेर ३ बाद ५३ धावा केल्या आहेत. भारताकडून पहिल्या दिवशी बुमराहने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले, तर उमेश यादवने २१ धावांवर जो रुटला त्रिफळाचीत केले.
महत्त्वाच्या बातम्या –
वोक्सच्या चेंडूने घेतली जडेजाच्या बॅटची कड अन् चेंडू विसावला थेट रुटच्या हातात, पाहा भन्नाट झेल
‘हे’ ३ विदेशी खेळाडू आयपीएलच्या कोणत्याही संघासाठी ठरतील हुकुमी एक्के, ज्यांना मिळायला हवी एक संधी
‘विराट एकवेळ जार्वोला संधी देईल, पण अश्विनला नव्हे’, ओव्हल कसोटीसाठीच्या संघनिवडीवर चाहते भडकले