असे म्हटले जाते की, एकदा क्रिकेटपटूने आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले की, यश आपोआप त्या क्रिकेटपटूच्या मागे धावते. अमाप पैस मिळतो, बंगला, गाडी सगळ्या गोष्टी त्या क्रिकेटपटूकडे असतात. पण, प्रत्येक आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या क्रिकेटपटूच्या वाट्याला हे सुख येत नसते.
भारत, ऑस्ट्रेलिया, इंग्लंडसारख्या मोठ्या क्रिकेट बोर्डांना सोडले. तर, इतर अनेक देशातील क्रिकेटपटूंना निवृत्तीनंतर जगण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. अशीच स्थिती मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला ३वेळा बाद करणाऱ्या एका गोलंदाजांवर उद्भवली आहे. तो गोलंदाज आज चक्क एक साधारण स्पोर्ट्स दुकान चालवत आहे. शिवाय, तो लोकांच्या घरी जाऊन त्यांचे एसी नीट करण्याचेही काम करत असतो.
‘रे प्राइस’, असे या गोलंदाजाचे नाव आहे. झिम्बाब्वेचा डावखुरा फिरकीपटू प्राइस याच्या गोलंदाजीवर मोठमोठ्या फलंदाजांना घाम फुटत असायचा. त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत फक्त २२ कसोटी सामन्यात ८० तर १०२ वनडे सामन्यात १०० आणि १५ टी२० सामन्यात १३ विकेट्स घेतल्या होत्या. शिवाय, २२ मे २०११ रोजी प्राइसला आयपीएलच्या मुंबई इंडियन्सकडून एक सामना खेळण्याची संधी मिळाली होती. पण, त्याला एकही विकेट घेता आली नव्हती.
प्राइसने २००२मध्ये झिम्बाब्वेच्या भारत दौऱ्यावेळी उल्लेखनीय गोलंदाजी प्रदर्शन केले होते. यावेळी दोन्ही संघात २ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. या मालिकेतील नागपुर येथील पहिल्या सामन्यात प्राइसने ५ विकेट्स घेतल्या होत्या. यात एक विकेट त्याने सचिनची घेतली होती. तर, दिल्लीतील दुसऱ्या कसोटी सामन्यात प्राइसने दोन्ही डावात सचिनला बाद केले होते. यावेळी त्याने एकूण ५ विकेट्स पटकावल्या होत्या.
सचिन प्राइसच्या गोलंदाजीवर खूप प्रभावित झाला होता. त्यामुळे या सामन्याच्या ९ वर्षांनंतर सचिनच्या नेतृत्त्वाखाली प्राइसला मुंबई इंडियन्समध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. तेव्हा सचिन आणि प्राइसमध्ये खूप चांगली मैत्री जुळली. परंतु, २०१३मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर या गोलंदाजावर खूप हलाखिची परिस्थिती उद्भवली. तो आता हरारे येथील एका स्पोर्ट्स दुकानात पबॅट, पॅड्स, ग्लब्ज आणि स्पोर्टचे दुसरे सामान विकतो.
ट्रेंडिंग घडामोडी-
‘विराट म्हणायचा; ‘ती’ अजूनही माझी गर्लफ्रेंड आहे, तर…
हरभजन म्हणतो, त्या घटनेमुळे ऑस्ट्रेलियाई मीडियाने मला मायकल जॅक्शन…
यष्टीरक्षक धोनीने इतके विक्रम केले मात्र हा विक्रम राहुनच गेला