भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियामध्ये पराभव होईल असे सांगणारा इंग्लंड संघाचा माजी कर्णधार मायकल वॉन हा त्याच्या भविष्यवाणीबद्दल प्रचंड ट्रोल झाला होता आणि त्यावेळी त्याला चाहत्यांच्या रोषाला सामोरे लागले होते. परंतु आता पुन्हा एकदा तो भारतीय संघाविषयी केलेल्या चेष्टेमुळे चर्चेत आला आहे. वॉनने केवळ इंग्लंडचे कौतुक केले नाही तर भारतीय संघाच्या रणनीतीची देखील खिल्ली उडवली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटीचा पहिला सामना चेन्नई येथे खेळला जात असून सामन्याचा पहिले २ दिवस हा इंग्लंड संघाने आपल्या नावावर करून घेतल्याचे दिसून आले. कर्णधार जो रूटच्या शानदार द्विशतकामुळे इंग्लंडला दुसऱ्या दिवसाखेर ८ बाद ५५५ धावांचा पल्ला गाठता आला.
इग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन हा पहिल्याच दिवशी इग्लंडच्या कामगिरीवर खुश झालाच पण त्याने त्यासोबतच भारतीय संघाच्या रणनीतीची देखील त्याने खिल्ली उडवली. त्याने ट्विटरमार्फत भारतीय संघव्यवस्थापनाने प्लेईंग इलेव्हनचा संघ हास्यास्पद निवडला असून कुलदीप यादवसारख्या क्रिकेटपटूला संघात का घेतले नसल्यचा सवाल उपस्थित केला.
Ridiculous decision by #India not to play @imkuldeep18 !!! If he isn’t going to play at home with the injuries they have when is he going to play !!! #INDvENG
— Michael Vaughan (@MichaelVaughan) February 5, 2021
क्रीकबझला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी म्हटल की, “रवींद्र जडेजा दुखापतीमुळे त्रस्त असल्याने त्याची कमतरता भारतीय संघाला जाणवत असेलच पण कुलदीप यादवसारख्या खेळाडूने ६ कसोटी सामन्याच्या २ डावात प्रत्येकी ५ विकेट्स घेतल्या असून सुद्धा त्याला संघात स्थान नाही ही माझ्यासाठी आश्चर्यकारक बाब आहे. मनगटाचा वापर करणारे फिरकीपटू नेहमी इग्लंडच्या फलंदाजांना त्रास देतात.
जो रुटचे द्विशतक –
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार जो रुटने द्विशतकी खेळी केली आहे. त्याने ३७७ चेंडूत २१८ धावा केल्या. या खेळीत रुटने १९ चौकार आणि २ षटकार मारले. तसेच चेन्नई येथे भारताविरुद्ध सुरु असलेला हा सामना रुटचा १०० वा कसोटी सामना असल्याने तो १०० व्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करणारा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.
त्याच्याशिवाय इंग्लंडच्या पहिल्या डावात बेन स्टोक्सनेही ८२ धावांची खेळी केली. त्याआधी डॉम सिब्लीने ८७ धावांची खेळी केली होती. त्यामुळे इंग्लंडला दुसऱ्या दिवसाखेरपर्यंत ८ बाद ५५५ धावा करता आल्या आहेत. दुसऱ्या दिवसाखेर भारताकडून इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, आर अश्विन आणि शहाबाज नदीमने प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
दु:खद! पदार्पणाच्या कसोटीत शतक आणि ५ विकेट्स घेणाऱ्या एकमेव क्रिकेटपटूचे निधन
इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत चेतेश्वर पुजारा शतक झळकावेल, दिग्गजाची भविष्यवाणी
रोहित विराटचा ‘मुंबई लोकल’ मिम तुफान व्हायरल, चाहत्यांची मिळतेय पसंती