फलंदाजांचे नंदनवन असलेल्या शारजाहच्या मैदानावर मंगळवारी (४ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात रंगतदार लढत झाली. या लढतीत हैदराबादने १० विकेट्सने मुंबईला नमवले आणि प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला. या सामन्यातून मुंबईचा नियमित कर्णधार रोहित शर्माने आयपीएलमध्ये पुनरागमन केले. परंतु त्याच्या या निर्णयामुळे बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली निराश झाला आहे.
रोहितला त्याच्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे येत्या ऑस्ट्रेलियावर संधी देण्यात आली नाही. त्यामुळे चाहत्यांनी निवड समितीला निशाण्यावर धरले होते. म्हणून बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने स्पष्ट केले होते की, रोहितने त्याच्या दुखापतीविषयी सावधगिरी बाळगायला हवी. त्याला पुन्हा हॅमस्ट्रिंगची दुखापत होण्याची शक्यता आहे. तरीही रोहितने आयपीएल सामने खेळायला सुरुवात केल्यामुळे गांगुलीने नाराजी व्यक्त केली आहे.
पीटीआयशी बोलताना गांगुली म्हणाला की, “रोहित दुखापतग्रस्त आहे. नाही तर आम्ही त्याच्यासारख्या खेळाडूला संघाबाहेर का ठेवले असते? तो मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचा उपकर्णधार आहे. आमचे त्याच्यावर पूर्ण लक्ष आहे. तो कधी पूर्णपणे बरा होईल मला माहिती नाही. आतापर्यंत तरी तो दुखापतीमुळे खेळताना दिसला नाही. आम्हाला त्याला बरे झालेले पाहायचे आहे. खेळाडूंना मैदानावर परत आणणे आमचे काम आहे. जर तो पूर्णपणे बरा झाला असेल, तर त्याने खेळावे.”
काही दिवसांपूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी रोहितला पुन्हा दुखापत झालेले पाहायचे नाही, असे म्हटले होते. त्यानंतर गांगुलीने वक्तव्य केले होते की, “रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली आहे. त्यामुळे तो पुन्हा दुखापतग्रस्त होण्याच्या शक्यता जास्त आहेत. त्याला मैदानावर पुनरागमन करायला थोडा वेळ लागेल. मुंबई संघाचे फिजिओ तसेच बीसीसीआयचे फिजिओ त्याच्या दुखापतीवर देखरेख ठेवत आहेत. त्याच्यापुढे त्याची मोठी क्रिकेट कारकीर्द पडली आहे. फक्त आयपीएलचा हा हंगाम किंवा येत्या ऑस्ट्रेलिया विरुद्धची मालिका नाही.”
महत्त्वाच्या बातम्या-
रोहितसाठी देश जास्त महत्त्वाचा का आयपीएल? माजी निवडकर्त्याच्या प्रश्नाने सोशल मीडियावर खळबळ
शतकांच्या ‘या’ मोठ्या विक्रमात पाकिस्तानी खेळाडूची हवा, विराट कोहलीवरही ठरला वरचढ
Eliminator: प्ले ऑफमध्ये पोहोचल्यानंतर हैदराबादच्या वॉर्नरचं कोहलीला ‘विराट’ चॅलेंज
ट्रेंडिंग लेख-
आर्थिक तंगीमुळे एकेवेळी प्लंबिंग व्हॅन चालणारा क्रिकेटर पुढे वेगाचा बादशाह झाला…
आयपीएल २०२०: प्रतिभा असूनही ‘हे’ पाच खेळाडू राहिले वंचित, नाही मिळाली संधी
मुंबईचे ३ धडाकेबाज खेळाडू, ज्यांना पुढील हंगामात केले पाहिजे रिलीझ