आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जसाठी 2020 वर्ष तितकेसे यशस्वी ठरले नाही. इतिहासात पहिल्यांदाच संघ टॉप 4 मध्ये राहण्यात हा संघ अयशस्वी ठरला. मात्र या सर्व वाईट परिस्थितीत संघासाठी जमेची बाब ठरली ती युवा ऋतुराज गायकवाडचा फॉर्म. सुरुवातीच्या काही सामन्यात अपयशी ठरल्यानंतर ऋतुराजने शेवटच्या तीन सामन्यात सलग तीन अर्धशतक झळकावले. ऋतुराजने या सर्व यशाचे श्रेय संघ व्यवस्थापनाला दिले आहे.
इंस्टाग्रामवरील एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋतुराज म्हणाला,” खेळाडूच्या कामगिरीचे बरेचसे श्रेय संघ व्यवस्थापनाला जाते. हे फार महत्वाचे असते की तुमच्या अपयशानंतर संघातील इतर खेळाडू व संघव्यवस्थापन तुमच्या बद्दल काय चर्चा करते आणि माझ्यामते चेन्नई संघ हा या बाबतीत सर्वोत्तम आहे. तुमच्या सभोवतालचे लोक जेव्हा अतिशय संयमी व शांत असतात, तेव्हा तुम्हाला ही उत्तम कामगिरी करण्याची प्रेरणा मिळते ”
ऋतुराजने आयपीएल 2020 मध्ये उत्तम कामगिरी केली होती व एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या चेन्नई संघाला अशा असेल की आयपीएल 2021 मध्ये देखील तो याच कामगिरीची पुनरावृत्ती करेल. ऋतुराज सध्या 10 जानेवारी पासून सुरु होणाऱ्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीची तयारी करत असून सर्व क्रिकेटप्रेमींच्या नजरा त्याच्या कामगिरीकडे असणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
सिडनी कसोटीत पदार्पण केलेल्या पुकोस्कीबरोबरच्या ‘त्या’ व्हायरल झालेल्या फोटोबद्दल पाँटिंग म्हणाला…
पहावं ते नवलंच! मार्नस लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवल्यावर केले असे काही की तुम्हालाही येईल हसू
वॉर्नरच्या बाद होण्याच्या पद्धतीवर माजी खेळाडूंनी उपस्थित केले प्रश्नचिन्ह, म्हणाले…