भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंत सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेद्वारे क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार असल्याचे वृत्त काही दिवसांपुर्वी पुढे आले होते. तेव्हापासून क्रिकेट चाहते डोळ्यात तेल घालून त्याला खेळताना पाहण्याची वाट पाहात होते. अखेर सोमवारी (११ जानवारी) चाहत्यांना श्रीसंतच्या गोलंदाजीचे दर्शन घडले. यादिवशी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर केरळ विरुद्ध पुदुच्चेरी संघात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील एक सामना झाला. या सामन्याद्वारे श्रीसंतने ७ वर्षांनंतर भारताच्या देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेसाठी मैदानावर पुन्हा पाऊल ठेवले.
दोन हात जोडून केले खेळपट्टीचे केले वंदन
या ३७ वर्षीय वेगवान गोलंदाजाने पुदुच्चेरीविरुद्ध ४ षटके गोलंदाजी केली. दरम्यान २९ धावा देत १ विकेट घेतली. विशेष म्हणजे, त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात गोलंदाजी करताना पुदुच्चेरीचा सलामीवीर फाबिद अहमदचा त्रिफळा उडवला. त्याच्या या कामगिरीमुळे संघातील इतर खेळाडूंनी मैदानावरच त्याला मिठी मारत शाबासकी दिली. यावेळी भावुक होऊन त्याने हाथ जोडून खेळपट्टीला प्रणाम केला.
यानंतर श्रीसंतने त्याच्या अधिकृत ट्विटर अकाउंटद्वारे ट्विट करत सर्वांचे आभार मानले. त्याने आपल्या विकेटचा व्हिडिओ शेअर करत लिहिले आहे की, “मला पाठिंबा देण्यासाठी आणि माझ्यावर एवढ प्रेम करण्यासाठी तुम्हा सर्वांचे आभार. ही फक्त सुरुवात होती. अजून खूप पुढे जायचे आहे. अपेक्षा करतो की, पुढेही तुमच्या प्रार्थना माझ्या पाठीशी असतील.”
Thanks a lot for all the support and love ..it’s just the beginning..with all of ur wishes and prayers many many many more to go..❤️????????????lots of respect to u nd family .. #blessed #humbled #cricket #bcci #kerala #love #team #family #india #nevergiveup pic.twitter.com/bMnXbYOrHm
— Sreesanth (@sreesanth36) January 11, 2021
केरळने ६ विकेट्सने मिळवला पहिला विजय
सामन्याविषयी बोलायचे झाले तर, प्रथम फलंदाजी करताना पुदुच्चेरी संघाने निर्धारित २० षटकात ६ बाद १३८ धावा केल्या. यात खालच्या फळीतील फलंदाज अशिथ राजीव याच्या सर्वाधिक नाबाद २६ धावांचा समावेश होता. यावेळी केरळकडून गोलंदाजी करताना श्रीसंतव्यतिरिक्त आसिफ केएमने एक विकेट घेतली होती. तर जलज सक्सेनाने सर्वाधिक ४ फलंदाजांना माघारी धाडले होते.
प्रत्युत्तरात केरळचा कर्णधार संजू सॅमसन याने सर्वाधिक ३२ धावा करत संघाच्या विजयाला हातभार लावला होता. सोबतच ३० वर्षीय फलंदाज मोहम्मद अझरुद्दीन यानेही ३० धावांचे योगदान दिले होते. यामुळे १८.२ षटकात केरळने १३९ धावा करत ६ विकेट्सने सामना खिशात घातला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
बापरे, या दुखापती का काय..! ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एक-दोन नव्हे तब्बल दहा भारतीय खेळाडू दुखापतग्रस्त
कसोटी क्रमवारी: सिडनी कसोटीतील झुंजार शतकाचा स्मिथला फायदा, विराटला पछाडत घेतली ‘या’ स्थानी उडी
सिडनी येथील कामगिरीने दादा खुश! म्हणाले ‘आता तुम्हाला समजले असेल की….’