श्रीलंका दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघासाठी चांगली बातमी येत आहे. यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन गुडघाच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरला आहे आणि वैद्यकीय टीमने तो तंदुरुस्त असल्याचे सांगितले आहे. तो आता पुन्हा एकदा निवड चाचणीसाठी उपलब्ध आहे. अशा परिस्थितीत संघ व्यवस्थापक शेवटच्या एकदिवसीय सामन्यात सॅमसनला संधी देऊ शकतील.
रविवारी (18 जुलै) श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात गुडघ्यात ताण आल्यामुळे संजू खेळू शकला नव्हता. संजूच्या अनुपस्थितीत ईशान किशनला श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एकदिवसीय सामन्यात पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. त्याने पहिल्याच वनडे सामन्यातच शानदार अर्धशतकही झळकावले होते. या कारणामुळे कर्णधार शिखर धवननेही दुसर्या वनडे सामन्यात ईशानवर विश्वास व्यक्त केला आणि त्याला अंतिम 11 खेळाडूच्या संघामध्ये सहभागी करून घेतले.
केरळच्या तिरुअनंतपुरमचे कॉंग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी ट्विट करुन संजू दुखापतीतून बरा झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे. ट्विट करत त्यांनी लिहिले आहे की, ‘संजू पुन्हा भारतीय संघात निवडीसाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेहून ही आनंदाची बातमी ऐकून खरोखरच खूप बरे वाटले. तिरुवनंतपुरमची शान असलेला संजू गुडघ्याच्या दुखापतीतून बरा झाला आहे आणि आता तो भारताकडून पुन्हा खेळू शकले.’
खरं तर संजूही केरळचाच आहे. त्यामुळे थरूर हे संजूच्या कामगिरीवर कायम नजर ठेवून असतात. त्यांनी त्याला भारतीय संघामध्ये संधी न मिळाल्याबद्दल अनेकदा नाराजी देखील व्यक्त केली आहे.
Delighted to hear from Sri Lanka that @IamSanjuSamson has recovered from his strained knee ligament and that Thiruvananthapuram's finest will again be available for India! All the best, Sanju!
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) July 19, 2021
राजस्थान रॉयल्सचा कर्णधारपद सांभाळले
इंडियन प्रीमियर लीगच्या राजस्थान रॉयल्सने 2021 मध्ये सॅमसनला कर्णधारपद देण्यात आले आहे. कोरोनामुळे आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यापूर्वी त्याने 7 सामन्यात 277 धावा केल्या होत्या. त्यामध्ये शतकाचा समावेश होता. त्याचबरोबर गुणतालिकेत राजस्थान रॉयल्स संघ पाचव्या क्रमांकावर होता. राजस्थानने सातपैकी तीन सामने जिंकले होते; तर चार सामन्यात पराभव पत्करावा लागला.
संजूला संधींचे सोने करता आले नाही
श्रीलंका मालिकेपूर्वी संघाच्या व्यवस्थापक ईशान किशन आणि संजू सॅमसन यांच्यापैकी कोणाला यष्टीरक्षणाची जबाबदारी देतील यावर बर्यापैकी चर्चा होती. मात्र यामध्ये ईशानची निवडण्यात आली. संजू सॅमसनच्या मार्गात दुखापत अडथळा ठरली. परंतु त्याच्या खेळात सातत्याचा अभाव देखील आहे. म्हणूनच त्याच्याकडे बर्याचदा दुर्लक्ष देखील केले जाते.
सॅमसनला बर्याच संधी मिळाल्या आहेत. पण तो अजूनही आपल्या खेळाची छाप सोडून शकला नाही. त्याचे खेळण्याचे तंत्र ईशान किशनपेक्षा चांगले आहे, असं अनेक क्रिकेट तज्ज्ञांनी म्हटलं आहे. पण जास्त आक्रमक फलंदाजीमुळे तो मोठा डाव खेळू शकलेला नाही आणि तो संघातून वगळला गेला. संजूने 7 टी-20 मध्ये 11.8 च्या सरासरीने 83 धावा केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
राडा! टीम इंडियाकडून पराभूत झाल्यानंतर श्रीलंकेच्या कोच-कर्णधाराचा पीचवर राडा, अगदी…