मुंबई । भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) च्या गव्हर्निंग कौन्सिल यांच्यात रविवारी बैठक झाली. या बैठकीत यंदा युएईमध्ये होणार्या लीगच्या 13 व्या सत्राला ग्रीन सिग्नल देण्यात आले. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर या कालावधीत ही स्पर्धा घेण्यात येणार असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले.
बीएसीसीआयला युएईमध्ये आयपीएल आयोजित करण्यासाठी भारत सरकारने मान्यता दिली आहे. मात्र, यानंतर असे काहीतरी घडले की आयपीएल सोशल मीडियावर जोरदार ट्रोल होऊ लागले. इतकेच नाही तर #ShameOnYouBCCI #BoyCottIPL#ChinesePreimierLeage# ShameOnYouBCCI या नावाने हॅशटॅग ट्रेंड करण्यास सुरवात केली.
गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीत बीसीसीआयने आयपीएल व्हिओच्या प्रायोजकांशी केलेला करार खंडित न करण्याचा निर्णय घेतला आहे. इतर चिनी कंपन्यांचा करार अबाधित ठेवण्यात आला आहे. याचा अर्थ असा आहे की गलवान घाटीमध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर आयपीएलची मुख्य प्रायोजक चिनी कंपनी विव्होला धक्का बीसीसीआय देणार अशी अपेक्षा चाहत्यांना होती. मात्र बीसीसीआयने विव्हो कंपनीशी करार कायम ठेवत चाहत्यांनाच मोठा धक्का दिला.
सध्याच्या आर्थिक अडचणीच्या परिस्थितीमुळे बोर्डासाठी इतक्या कमी वेळात नवीन प्रायोजक शोधणे कठीण होईल, असे बीसीसीआयने स्पष्टपण सांगितले. यामुळे सर्व प्रायोजकांशी नाते कायम ठेवले आहे.
रविवारी झालेल्या बैठकीत बीसीसीआयने चिनी कंपनीबरोबरचा करार कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. विव्हो आयपीएलच्या 13 व्या हंगामासाठी मुख्य प्रायोजक आहे, तर पेटीएम, ड्रीम 11, बैजस आणि स्विगीमध्ये चिनी गुंतवणूक आहे. भारत आणि चीनमधील सध्याचा तणाव लक्षात घेता, दहासूत्री अजेंड्यातील हा मुद्दा सर्वात महत्वाचा होता.
विव्होबरोबर झालेल्या या करारामुळे बीसीसीआयला एका वर्षात 440 कोटी रुपये मिळतात ही वस्तुस्थिती आहे. अशा परिस्थितीत बीसीसीआयने चिनी कंपनीशी संबंध न मोडण्याच्या निर्णयामुळे बीसीसीआय आणि सौरव गांगुली ट्विटरवर ट्रोल होत आहेत.
चाहत्यांनी बीसीसीआयला लक्ष्य करत म्हटले की, बीसीसीआयला लाज वाटली पाहिजे. त्याचवेळी एका चाहत्याने सांगितले की, बीसीसीआय आणि आयपीएलने अद्याप या निर्णयावर विचार केला पाहिजे. एका चाहत्याने लिहिले की देश प्रथम येतो. बीसीसीआयला फक्त पैसे कमवायचे आहेत. सैनिकांचा सन्मान करा आणि आयपीएलवर बहिष्कार घाला. सोशल मीडियावर तो चिनी प्रीमियर लीगच्या नावाखालीही ट्रेंड होत आहे.
गेल्या महिन्यात लडाखच्या सीमेवर असलेल्या गलवान खोरयात भारत आणि चीनच्या सैन्यांदरम्यान झालेल्या हिंसक संघर्षानंतर चीनविरोधी वातावरण देशभर तापले आहे. भारत-चीन सीमेवर झालेल्या हिंसाचारात 20 भारतीय सैनिक शहीद झाले. तेव्हापासून चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी होत होती.
काही दिवसांपूर्वी बीसीसीआयचे कोषाध्यक्ष अरुण धुमाळ म्हणाले होते की, “आयपीएलसारख्या भारतीय स्पर्धेत चिनी कंपन्यांच्या प्रायोजकतेमुळे देशाला फायदा होत आहे. बीसीसीआयला वीवोकडून वर्षाकाठी 440 कोटी रुपये मिळतात. या कंपनीसोबतचा पाच वर्षांचा करार 2022 मध्ये संपणार आहे.