गेल्या २ वर्षांत भारताचे अनेक क्रिकेटपटू लग्नबंधनात अडकले आहेत. यात आता भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरचाही या क्रिकेटपटूंमध्ये समावेश होणार आहे. शार्दुलने सोमवारी एका छोट्या सोहळ्यात त्याचा साखरपुडा उरकला आहे. त्याने त्याची प्रयसी मिताली परुळेकर हिच्यासह साखरपुडा केला आहे.
शार्दुलच्या साखरपुड्याच्या सोहळ्याचे अनेक व्हिडिओ आणि फोटो सध्या व्हायरल होत आहेत. दरम्यान, माध्यमांतील वृत्तानुसार शार्दुल आणि मिताली बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशीपमध्ये होते. आता अखेर त्यांनी साखरपुडा करत त्यांच्या नात्याला नवे नाव दिले आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलल्या वृत्तानुसार मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बीकेसी येथील एका हॉलमध्ये शार्दुलचा साखरपुडा पार पडणार होता. तसेच या सोहळ्यासाठी केवळ ७५ लोकांनाच आमंत्रित करण्यात येणार होते. ज्यात दोघांचे कुटुंबिय आणि मित्रमंडळींचा समावेश आहे.
त्याचबरोबर असेही समोर येत आहे की मिताली आणि शार्दुल पुढील वर्षी होणाऱ्या टी२० विश्वचषकानंतर लग्न करणार आहेत. पुढीलवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये टी२० विश्वचषक होणार आहे.
Even Shardul Thakur is engaged, how can we single people will use those memes now ????. Whatever Congratulations lord Shardul & Mithali ????❤️. So pretty ???? pic.twitter.com/uYFTWldsJE
— Aditi???? (@Sev_Khamani) November 29, 2021
शार्दुल नुकताच संयुक्त अरब अमिराती आणि ओमान येथे पार पडलेल्या टी२० विश्वचषकात खेळला होता. त्यानंतर त्याला विश्रांती देण्यात आली होती. या विश्रांतीच्या काळात त्याने त्याचा साखरपुडा उरकला आहे.
https://twitter.com/error_094/status/1465215975490416643
यानंतर तो पुढील महिन्यात होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. या दौऱ्यात भारतीय क्रिकेट संघाला वनडे, कसोटी आणि टी२० अशा तिन्ही प्रकारच्या मालिका खेळायच्या आहेत. पण, अजून दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड झालेली नाही.
Congratulations to Shardul & Mithali, lots of yellove for the new innings. ???? pic.twitter.com/txAP6OgJ6j
— WhistlePodu Army ® – CSK Fan Club (@CSKFansOfficial) November 29, 2021
शार्दुल हा भारताचे आंतरराष्ट्रीय क्रिकेमध्ये तिन्ही क्रिकेट प्रकारात प्रतिनिधित्त्व करतो. त्याने आत्तापर्यंत ४ कसोटी, १५ वनडे आणि २४ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत १४ विकेट्स घेतल्या असून ३ अर्धशतके देखील केली आहेत. तसेच त्याने वनडेत २२ विकेट्स घेतल्या आहेत. याचबरोबर त्याने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये ३१ विकेट्स घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये गेल्या चार हंगामापासून चेन्नई सुपर किंग्स संघाचे प्रतिनिधित्तव करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“रिषभ आमचा पहिल्या क्रमांकाचा खेळाडू, तो उपलब्ध नसल्यास वृद्धिमान साहाची गरज भासते”
पाच नाही; सहा नाही, तब्बल १० देशांत कसोटी शतके करणारे जगातील २ फलंदाज
कानपूर कसोटीत भारत की न्यूझीलंड, कोण मारणार बाजी? दिग्गजाने केली भविष्यवाणी