इंडियन प्रीमियर लीग २०२०च्या दिल्ली कॅपिटल्स संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनला हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात जोरदार सुरुवात करता आली नाही. परंतु गेल्या काही सामन्यात त्याच्या फलंदाजीने विरुद्ध संघाला घाम फोडला आहे. पण अचानक धवनच्या फॉर्ममध्ये येण्यामागचे रहस्य नक्की काय आहे, याची सर्वांना चिंता लागली आहे. आता स्वत: धवनने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
न्यूज एजन्सी एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत धवन म्हणाला की, “आमचे संघ प्रशिक्षक रिकी पाँटिंगमुळे माझ्यात आत्मविश्वास निर्माण झाला. ते मला म्हणाले की, मी चांगली फलंदाजी करत आहे, पण मला वेगाने खेळावे लागेल. मला सुरुवातीला वाटत होते की, टी२० क्रिकेटमध्ये २०-३० धावा करणेच खूप महत्त्वाचे असते. त्यामुळे मी व्यवस्थितपणे माझी सलामीवीर फलंदाजाची भूमिका निभावत आहे.”
“पण जेव्हा मी या हंगामातील पहिले अर्धशतक केले, तेव्हा माझ्यात आत्मविश्वास जागा झाला आणि मी २ शतकेही लगावली. मी मैदानावर गेल्यावर जास्त दबाव न घेता केवळ माझी उत्कृष्ट खेळी करण्याच्या विचारात असतो. त्यामुळे मला मानिसक बळ मिळते,” असे पुढे बोलताना धवन म्हणाला.
तसेच या हंगामात ५०० धावांचा आकडा गाठण्याविषयी बोलताना धवन म्हणाला की, “माझ्यासाठी या हंगामात ५०० धावा पूर्ण करणे, हे एका स्वप्नासारखे होते. पण आता मी ५०० धावांच्या जवळ पोहोचलो आहे.”
धवनने या हंगामातील सुरुवातीच्या काही सामन्यात जास्तीत जास्त २०-३० धावा केल्या होत्या. पण गेल्या ४ सामन्यात त्याने २ अर्धशतके आणि २ शतके ठोकली आहेत. यासह आयपीएलच्या इतिहासात सलग २ शतके लगावणारा तो पहिलाच फलंदाज ठरला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएलमध्ये चेन्नईविरुद्ध जे कोणत्याच संघाला करता आले नाही ते मुंबई इंडियन्सने करुन दाखवले
काय सांगता? फक्त एका चेंडूत काढल्या २८६ धावा, वाचा कधी झाला हा अनोखा विक्रम
मुंबईविरुद्ध ५० धावा करताच चेन्नईने बेंगलोरला केले ट्रोल, जाणून घ्या कारण
ट्रेंडिंग लेख-
आयपीएलच्या १३ व्या हंगामात धोनीचा चेन्नई संघ झाला फ्लॉप, ही आहेत ३ प्रमुख कारणे