भारताचा युवा सलामीवीर फलंदाज शुबमन गिल न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. मालिकेतील पहिल्या सामन्यात गिलने 50, तर दुसऱ्या सामन्यात नाबाद 45 धावांची खेळी केली. दुसरा सामना पावसामुळे पूर्ण होऊ शकला नाही. या सामन्यात गिल मोठी खेली करण्याच्या विचारत दिसत होता, पण पावसामुळे ते शक्य होऊ शकले नाही. अशात क्रिकेटचे सामने बंद छताखाली खेळवणे हा एक चांगला पर्याय आहे, असे गिलला वाटते.
भारतासाठी या सामन्यात शुबमन गिल (Shubman Gill) आणि सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) चांगल्या फॉर्ममध्ये फलंदाजी करत होते. पण तितक्यात पाऊस आल्याने खेळ थांबवला गेला आणि पुन्हा सुरू देखील होऊ शकला नाही. सामना संपल्यानंतर शुबमन गिल माध्यमांशी बोलत होता. यावेळी तो म्हणाला, “हा निर्णय (इंनडोअर स्टेडियममध्ये सामना खेळवण्याचा) बोर्डाला घ्यायचा आहे. एक खेळाडू आणि चाहता असल्याच्या नाते एवढे सामने पावसामुळे प्रभावित होणे माझ्यासाठी अडचणीची बाब आहे. मी याविषयी जास्त काय बोलू शकतो, कारण हा मोठा निर्णय आहे. नक्कीच बंत छताच्या स्टेडियममध्ये सामना खेळवणे हा चांगला पर्याय असेल.”
भारतीय संघाला या न्यूझीलंड दौऱ्यात आतापर्यंत तीन सामन्यांमध्ये पावसामुळे बाधा निर्माण झाली आहे. यातील दोन सामना रद्द केले गेले, तर एका सामन्याचा निकाल डकवर्थ लुईलच्या आधारे दिला गेला. चालू सामन्यात जेव्हा पाऊस येतो, तेव्हा खेळाडूंना पुढचा अंदाज बांधून खेळता येत नाही, असेही गिल पुढे बोलताना म्हणाला. पुढच्या वर्षी भारतात आयसीसीचा एकदिवसीय विश्वचषक खेळला जाणार आहे. या विश्वचषकात भारतीय संघाकडून खेळण्यासाठी गिल एक महत्वाचा दावेदार आहे. मात्र, तो विश्वचषकाचा विचार करून सध्या खेळत नाहीये. सध्या ज्या सामन्यांमध्ये संधी मिळेले त्या सामन्यांमध्ये संघासाठी मोठी खेळी करणे, ही एकच गोष्टी त्याच्या डोक्यात आहे, असेही तो म्हणाला. (Shubman Gill is upset because of the rain, he suggested this solution to the board)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
FIFA WORLD CUP: अनपेक्षित निकालांचे सत्र सुरूच; दुसऱ्या क्रमांकावरील बेल्जियम मोरोक्कोकडून चित
गिलचा ‘सुपरफॅन’ बनलाय हा भारतीय दिग्गज; म्हणतोय, ‘तो स्पेशलच आहे”