भारत आणि श्रीलंका यांच्यात तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना रविवारी (१८ जुलै) कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात दोन्ही संघ आणि खेळाडूंना अनेक नवनवे विक्रम करण्याची संधी असेल. आपण या लेखामध्ये या काही खास विक्रमांबाबत जाणून घेणार आहोत.
१) भारत आणि श्रीलंका यांच्यात आत्तापर्यंत एकूण १५९ सामने खेळले गेले आहेत, त्यापैकी ९१ सामने भारतीय संघाने जिंकले आहेत. त्याचबरोबर श्रीलंकेच्या संघाने ५६ सामन्यात विजय नोंदवला आहे. दोन्ही संघांमधील एक सामना बरोबरीत सुटला तर, ११ सामने अनिर्णीत राहिले. या सामन्यात भारताला श्रीलंकेविरुद्धच्या ९२ व्या विजयाची संधी असेल. दुसरीकडे, श्रीलंका भारताविरुद्ध ५७ वा विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल.
२) भारत आणि श्रीलंका यांच्यात कोलंबोच्या आर प्रेमदासा क्रिकेट स्टेडियमवर एकूण ३३ वनडे सामने खेळले गेले आहेत ज्यामध्ये दोन्ही संघांनी १५-१५ सामने जिंकले आहेत. त्याचवेळी ३ सामन्यांचा निकाल लागू शकला नाही. मालिकेतील पहिल्या सामन्यात दोन्ही संघांना एकमेकांविरूद्ध १६ वा विजय मिळवण्याची संधी असेल.
३) हा सामना भारतीय क्रिकेट इतिहासातील ९९४ वा वनडे सामना असेल. आतापर्यंत भारताने आपल्या ९९३ वनडे सामन्यांमध्ये ५१६ सामने जिंकले आहेत. तर, ४२७ सामने गमावले. भारताचे आतापर्यंत ९ वनडे सामने बरोबरीत राहिले तर, ४१ सामने अनिर्णीत राहिले.
४) या सामन्यात शिखर धवनने २३ धावा केल्या तर तो भारताकडून खेळताना ६००० धावा पूर्ण करेल. अशी कामगिरी ज्ञकरणारा तो दहावा फलंदाज ठरेलल. शिखर धवन या सामन्यात कर्णधार म्हणून खेळेल. वनडे क्रिकेटमध्ये तो भारताचे नेतृत्व करणारा २५ वा कर्णधार असेल. प्रथमच श्रीलंकेचे नेतृत्व करत असणारा दसून शनाकादेखील आपल्या देशाचा २५ वा कर्णधार ठरेल.
५)जर युजवेंद्र चहलने या वनडे मालिकेत ८ विकेट्स घेतल्या, तर तो वनडेत १०० विकेट्स पूर्ण करेल. तसेच भारताकडून १०० विकेट्स घेणारा २४ वा गोलंदाज ठरेल.
६) श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झालेल्या नितीश राणा, ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल, सूर्यकुमार यादव, कृष्णप्पा गॉथम, ईशान किशन, वरुण चक्रवर्ती, चेतन सकारिया आणि राहुल चाहर यांनी अजून वनडे पदार्पण केलेले नाही. त्यामुळे यांच्यातील कोणालाही श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिकेत संधी मिळाल्यास ते त्यांचे वनडे पदार्पण ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या –
‘न भूतो’! अखेरच्या षटकात सलग सहा षटकार ठोकत ‘या’ खेळाडूने संघाला मिळवून दिले विजेतेपद
भारतीय संघ डरहॅमला आले एकत्र; रोहित म्हणाला, ‘सुटी संपली, आता कामाला सुरुवात’
लुईसच्या वादळात उडाली ऑस्ट्रेलिया; टी२० मालिकेत ४-१ अशी सरशी साधत वेस्ट इंडिजने दाखवला दम