कोव्हिड-19 या साथीच्या रोगामुळे उद्भवलेल्या परिस्थितीनंतरही इंग्लंडविरुद्ध होणारी मालिका भारतातच व्हावी यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ सर्वतोपरी प्रयत्न करेल असे मत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सोमवारी व्यक्त केले. देशांतर्गत क्रिकेट स्पर्धादेखील सुरू करता येतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यूएई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मालिका भारतातच व्हावी याला प्राधान्य
पुढील वर्षी जानेवारी ते मार्च यादरम्यान इंग्लंडला पाच कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी भारत दौरा करायचा आहे. इंग्लंडविरूद्ध होणारी मालिका यूएईमध्ये आयोजित करण्याच्या पर्यायाबद्दल विचारले असता गांगुली यांनी सांगितले, “इंग्लंडविरुद्धची मालिका भारतातच व्हावी यालाच आम्ही प्राधान्य देऊ. भारतीय मैदानावरच सामने व्हावे याचा आम्ही प्रयत्न करू.”
तयार करावे लागेल जैव सुरक्षित वातावरण
तेथे सामना करण्यासाठी बीसीसीआयने अलीकडेच अमिरात क्रिकेट बोर्डाशी सामंजस्य करार केला होता. गांगुली म्हणाले, “आमच्याकडे मुंबईत सीसीआय, वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियम देखील आहेत.” आमच्याकडे ईडन गार्डन देखील आहे. आम्हाला बायो बबल (जैव-सुरक्षित वातावरण) तयार करावे लागेल. आम्हाला आमचे क्रिकेट भारतात खेळायचे आहे, परंतु आम्ही कोरोना व्हायरसच्या स्थितीवरही लक्ष ठेवत आहोत. ”
मुंबईत आहेत तीन स्टेडियम
पुढे बोलतांना ते म्हणाले, “आमच्याकडे मुंबईत सीसीआय, वानखेडे आणि डीवाय पाटील स्टेडियम आहेत. आमच्याकडे ईडन गार्डन देखील आहे. आम्हाला जैव-सुरक्षित वातावरण तयार करावे लागेल.भारतात क्रिकेट सुरु व्हावे अशी सर्वांची इच्छा आहे परंतु आम्ही कोरोना व्हायरसच्या स्थितीवरही लक्ष ठेवत आहोत.”
सामान्य जीवन सुरु झाले पाहिजे
“मागील सहा महिने प्रत्येक कामासाठी कठीण होते. सामान्य जीवन परत सुरु झाले पाहिजे असे खेळाडूंनाही वाटते, पण आपण कोव्हिड-19 च्या स्थितीवर बारकाईने नजर ठेवायला हवी. बीसीसीआयने 2019-20 मध्ये पुरुष आणि महिलांसाठी देशांतर्गत सामन्यांचे आयोजन केले होते. जर सर्व गोष्टी सर्वसामान्य असत्या तर रणजी करंडक, दुलीप कारकंड, 23 वर्षाखालील सीके नायडू करंडक, विजय हजारे कारकंड, देवधर करंडक, सय्यद मुश्ताक अली करकंड अशा स्पर्धा घेण्यात आल्या असत्या.” असेही पुढे बोलतांना गांगुली यांनी सांगितले
देशांतर्गत सामन्यांचे आयोजन करण्याचा करू प्रयत्न
परिस्थितीबद्दल बोलतांना गांगुली म्हणाले “आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. आम्हाला देशांतर्गत होणाऱ्या सामन्यांचा हंगाम सुरू करायचा आहे. या परिस्थितीत सामन्यांचे आयोजन कसे करायचे याचा विचार आम्ही करत आहोत. आम्ही त्यासाठी शक्य तितके प्रयत्न करू.”
धोनी चांगली कामगिरी करेल
माजी भारतीय कर्णधार एमएस धोनीच्या आयपीएलमधील कामगिरीबद्दल विचारले असता गांगुली म्हणाले, “हा करिष्माई खेळाडू चेन्नई सुपर किंग्ससाठी चांगली कामगिरी करेल. सध्याच्या परिस्थितीत लय मिळण्यास थोडा वेळ लागेल. तो दीड वर्ष क्रिकेट खेळलेला नाही. तुम्ही कितीही चांगले असलात तरी पुनरागमन करणे सोपे नसते.”