भारतात सुरू असलेल्या आयपीएल 2021 च्या तिसर्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने (केकेआर) सनरायजर्स हैदराबाद संघावर 10 धावांनी विजय मिळवला. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला उतरलेल्या कोलकाता संघाने निर्धारित 20 षटकांत 6 गडी गमावून 187 धावा केल्या. प्रत्युत्तरात सनरायझर्स हैदराबाद संघाला निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 177 धावा करता आल्या आणि केकेआरने 10 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला.
यानंतर हैदराबाद संघाचा कर्णधार डेविड वॉर्नरने त्याच्या गोलंदाजांना या पराभवासाठी जबाबदार धरले आहे. त्याच्या मते या खेळपट्टीवर त्याचे गोलंदाज अधिक चांगली कामगिरी करू शकले असते. कारण मोठी आकडी धावसंख्या उभी करण्यासारखी ही खेळपट्टी नव्हतीच असे त्याचे मत आहे.
पराभवानंतर वॉर्नरने आपल्या सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले की, “मला वाटत नाही की, ही उच्च धावसंख्या उभी करण्यासारखी खेळपट्टी होती. विरोधी संघाने खरोखर चांगली फलंदाजी केली. तसेच त्यांच्या फलंदाजामध्ये चांगली भागीदारी झाली होती. त्यामुळे त्यांनी अधिक धावा बनवल्या. बहुतेक आम्ही षटकांतील पहिले चेंडू खेळण्यात अयशस्वी ठरलो. त्यामुळे शेवटी आम्हाला मोठ्या धावसंख्येचा सामना करावा लागला.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “आमच्या संघातील खेळाडू सुरुवातीला स्वस्तात बाद झाले. परंतु जॉनी बेअस्टरो आणि मनीष पांडेने पुन्हा एकदा आम्हाला चांगल्या स्थितीत आणले. त्यामुळे आम्हाला आणखी एक संधी मिळाली होती. तसेच मैदानावर पडलेले दवदेखील कारणीभूत ठरले. जेव्हा गोलंदाज ओव्हर पिच गोलंदाजी करायचे तेव्हा फटका मारणे सोपे जात होते आणि जेव्हा गोलंदाज क्रॉस-सीमसोबत गोलंदाजी करायचे तेव्हा चेंडू थांबून येत असल्याने त्याला मारणे कठीण जात होते. आमची हा पहिला सामना जिंकण्याची इच्छा होती. परंतु याच ठिकाणी अजून आमच्याकडे आणखी चार सामने आहेत. त्यामुळे या मैदानाला व्यवस्थित समजून घेऊन पुन्हा या मैदानामध्ये आम्ही चांगली कामगिरी करु.”
महत्त्वाच्या बातम्या-
‘काय सुरुवात होती’ पृथ्वी शॉच्या सुपरहिट फलंदाजीची गर्लफ्रेंडलाही पडली भुरळ; केली स्तुती
SRH विरुद्ध ‘भज्जी’ने केवळ एक षटक केली गोलंदाजी; कर्णधार मॉर्गनने सांगितले यामागचे कारण
नितीश राणाचा नवा पॅटर्न! अर्धशतक झळकावताच केले आगळेवेगळे सेलिब्रेशन, सोशल मीडियावर एकच चर्चा