भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेत दोन्ही संघ १-१ अशा बरोबरीवर आहेत. मलिकेत इंग्लंडचा कर्णधार चांगल्या फॉर्ममध्ये असून भारतीय गोलंदाजांसमोरचे सर्वात मोठे आव्हान बनला आहे. त्याने मालिकेतील तीन कसोटी सामन्यांमध्ये १२६ च्या सरासरीने ५०७ धावा केल्या आहेत. ज्याप्रकारे रूट फलंदाजी करत आहे, ते पाहता मलिकेतील राहिलेल्या दोन सामन्यांमध्ये त्याला लवकर बाद करणे भारतीय संघासाठी मोठे आव्हान असणार आहे. अशातच इंग्लंडचा माजी वेगवान गोलंदाज स्टीव हार्मिसनने रूटला बाद करण्यासाठी उपाय सांगितला आहे. तसेच वीवीएस लक्ष्मणने चौथ्या कसोटी सामन्यात त्याला रोखण्यासाठी गोलंदाजाचा पर्यायही सुचवला आहे.
हार्मिसनने ईएसपीएन क्रिकइंफोवर मॅट डे कार्यक्रमात बोलताना म्हटले की, “रूट एक अप्रतिम फलंदाज आहे. एक गोलंदाजाच्या रूपात तुम्ही त्याला लवकर बाद करू इच्छिता. कारण डावाच्या सुरुवातीला जेव्हा रूट २०-३० धावा करतो तेव्हा त्याला थांबवणे किंवा बाद करणे अवघड होते. जर भारतीय गोलंदाजाना रूटला बाद करायचे असेल तर विशेष करून क्षेत्ररक्षणावर लक्ष द्यावे लागेल. रूटला ज्या भागात धावा बनवण्यापासून रोखावे लागेल, जेथे तो सतत त्याचे शाॅट्स खेळून धावा करत आहे. त्याच्या जास्त धावा थर्डमॅनच्या भागातून येतात. जर तिथला खेळाडू वर गेला तर तो तेथून चौकार मिळवतो आणि जर खेळाडू माग थांबला तर तो एक धाव घेतो आणि स्ट्राइक बदलत राहतो.”
तो पुढे म्हणाला, “असे असले तरीही, भारतीय गोलंदाजांना या गोष्टीवर विश्वास ठेवावा लागेल की जेव्हा तो त्याच्या डावाला सुरुवात करतो. तेव्हा त्याला ऑफ स्टंप आणि त्याच्या जवळून येणाऱ्या चेंडूची एकप्रकारे भीती असते. तो कोणता चेंडू बाहेर किंवा आत येऊ शकतो, याचा विचार करत राहातो आणि विकेट गमावतो. अशाच चेंडूवर रूट ऑस्ट्रेलियाविरुद्ध बाद झाला होता. मागच्या सामन्यात रूट आणि मलान दोघांना ऑफ स्टंपच्या बाहेर खूप चेंडू टाकले गेले आणि दोघांनीही खेळपट्टीच्या दोन्ही बाजूंना खूप धावा केल्या होत्या. भारतीय गोलंदाजांना ही गोष्टीही लक्षात ठेवावी लागेल”
भारताचा माजी फलंदाज वीवीएस लक्ष्मणे चौथ्या कसोटीविषयी बोलताना सांगितले. “जेव्हा एखादा फलंदाज त्याच्या चांगल्या फॉर्ममध्ये असतो तेव्हा तुम्ही गोलंदाजाच्या रूपाच जास्त प्रयोग नाही केले पाहिजेत. तुम्ही फक्त त्याच भागात गोलंदाजी केली पाहिजे, ज्या भागात त्याला अडचण येते. एकंदरीत तो जास्त वेळा ऑफ स्टंपच्या आसपासच्या चेंडूवर बाद झाला आहे. बुमराह असो किंवा दुसरा कोणता गोलंदाज, रूट नेहमी याच रेषेतील चेंडूंवर बाद झाला आहे. मला वाटते की भारतीय गोलंदाजानी याच रेषेत गोलंदाजी करत राहावे आणि रूटच्या धैर्याचीही परीक्षा घ्यावी.”
रविचंद्रन अश्विनला भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्याविषयी लक्ष्मण म्हणाला, “रूटला बाद करण्याचा किंवा त्याच्यावर दबाव निर्माण करण्याचा आणखी एक मार्ग आहे की, अश्विनला संघात घेतले जावे. त्याचे सर्वात मोठे कारण आहे जेव्हा एखादा फलंदाज फॉर्ममध्ये असतो तेव्हा त्याला हे चांगले माहित असेत विरोधी गोलंदाज कोणत्या योजनेसह गोलंदाजी करत आहेत. अश्विन आतापर्यंत या मालिकेत खेळला नाहीये. त्यामुळे रूटला त्याची गोलंदाजी समजून घेण्यात वेळ जाईल.”
महत्त्वाच्या बातम्या-
गेल्या ५० वर्षांत ओव्हलवर उघडले नाही विजयाचे खाते; ‘विराटसेना’ करणार हा नकोसा रेकॉर्ड ब्रेक…!
ओव्हल कसोटीत अश्विन आणि शार्दुलचे पुनरागमन? ‘अशी’ असू शकते भारताची संभाव्य प्लेइंग Xi
आयर्लंडचा टी२०त इतिहास, एकाच आठवड्यात २ शतके ठोकत केला कोणालाही न जमलेला किर्तीमान