भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना तिरुअनंतपुरम येथे खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी केलेल्या शानदार कामगिरीवर सूर्यकुमार यादव व केएल राहुल यांनी कळस चढवत भारतीय संघाला आठ गड्यांनी विजय मिळवून दिला. भारताचा युवा वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग हा सामन्याचा मानकरी ठरला. या सामन्यात नाबाद अर्धशतक साजरे करणारा फलंदाज सूर्यकुमार यादव याने या खेळीत अनेक विश्वविक्रमांना गवसणी घातली.
दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या 107 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झालेली. रोहित शर्मा व विराट कोहली हे दोन्ही अनुभवी फलंदाज झटपट तंबूत परतले. मात्र, त्यानंतर केएल राहुल व सूर्यकुमार यादव यांनी नाबाद मॅचविनिंग भागीदारी रचत भारताला विजय मिळवून दिला. दोघांनी 93 धावा जोडल्या. सूर्यकुमारने 33 चेंडूवर 5 चौकार व 3 चौकारांसह नाबाद 50 धावा केल्या. हे त्याच्या कारकिर्दीतील आठवे अर्धशतक ठरले.
या खेळी दरम्यान त्याने चालू वर्षात आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये 700 पेक्षा जास्त धावांचा टप्पा पार केला. टी20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज बनला. त्याच्या नावे 732 धावांची नोंद झाली आहे. यासोबतच सूर्यकुमार हा एका वर्षात सर्वाधिक टी20 षटकार ठोकणारा फलंदाजही बनला. त्याने यावर्षी आतापर्यंत 45 षटकार लगावले आहेत. तसेच आपल्या पहिल्या 30 डावांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट (173.4) सर्वाधिक ठरला.
महत्वाच्या बातम्या –
चहर-अर्शमूळे दक्षिण आफ्रिका फर्शवर! सर्व प्रकारच्या टी20 मधील सर्वात लाजिरवाणी कामगिरी केली नावावर
विराट-रोहितमध्ये लागलीये महानतेची रेस! दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोघांतच रंगणार ‘रनसंग्राम’