सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान चार सामन्यांची कसोटी मालिका खेळली जात आहे. मालिकेतील अखेरचा सामना 9 मार्चपासून अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न दोन्ही संघ करतील. त्याचवेळी या मालिकेसाठी भारतीय संघात संधी दिला गेलेला फलंदाज सूर्यकुमार यादव हा केवळ एकच सामना खेळू शकला. मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर त्याला बाकावर बसवण्यात आले. त्याच्या कसोटी कारकिर्दीबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉंटिंग याला विचारण्यात आले. त्यावर त्याने समर्पक उत्तर दिले.
सूर्यकुमारला टी20 क्रिकेटमधील सातत्यपूर्ण कामगिरीनंतर भारतीय कसोटी संघात स्थान देण्यात आले होते. नागपुर येथील पहिल्या कसोटीत त्याला पदार्पण करण्याची संधी देखील मिळाली. मात्र, आपल्या पहिल्या सामन्यात तो केवळ आठ धावा करू शकला. त्यानंतर पुढील दोन सामन्यात त्याला संघात जागा मिळाली नाही.
नुकतेच एका कार्यक्रमात सूर्यकुमारवर कसोटी क्रिकेटच्या बाबतीत अन्याय झाला का? असा प्रश्न रिकी पॉंटिंग याला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“मला वाटत नाही की सूर्यकुमारवर अन्याय झाला आहे. श्रेयस अय्यर ज्यावेळी संघातील त्यावेळी त्याला खाली बसवले जाणार होतेच. कारण, श्रेयसने मागील वर्षभरात खासकरून भारतातील खेळपट्ट्यांवर उत्कृष्ट कामगिरी केली होती. केवळ तो अनुपस्थितीत असल्याने सूर्यकुमारला संधी मिळालेली. मात्र, एक नक्की आहे की, लवकरच त्याची देखील वेळ येईल. मला खात्री आहे तो कसोटी क्रिकेटमध्ये देखील यशस्वी होईल.”
भारतीय संघाच्या मध्यस्थळीत सध्या अनेक खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. त्यामुळे सूर्यकुमार यादव याला अंतिम अकरामध्ये स्थान मिळवण्यात अपयश येत आहे.
(Suryakumar Yadav Not Unlucky For Less Opportunity In Test Cricket Ricky Ponting Said)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबई इंडियन्सच्या ‘बिग बॉय’ने गाजवला पीएसएलचा पहिलाच सामना! रावळपिंडीत बॅटने आणले वादळ
टीम इंडियाला ‘ओव्हर कॉन्फिडन्ट’ म्हणताच भडकला कॅप्टन रोहित, शास्त्रींच्या ‘त्या’ वक्तव्याचा घेतला समाचार