भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यानच्या 4 सामन्यांच्या बहुप्रतीक्षित कसोटी मालिकेतील दोन सामने बाकी आहेत. मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारी रोजी सिडनी क्रिकेट ग्राउंड येथे होणार असून, चौथा सामना 15 जानेवारी रोजी ब्रिस्बेन क्रिकेट ग्राउंड येथे खेळला जाणार आहे. मात्र आता बातमी समोर येत आहे की भारतीय संघ ब्रिस्बेनला जाण्यास तयार नाही. ब्रिस्बेनमध्ये खेळाडूंना काही कडक कोरोना नियमांना सामोर जावे लागेल व त्या दृष्टीने भारतीय संघाने तिथे न जाण्याची आपली इच्छा व्यक्त केली आहे.
एका सूत्राने प्रतिक्रिया देताना सांगितले, “आम्ही ऑस्ट्रेलियात पोहोचण्यापूर्वी दुबईमध्ये क्वारंटाईन होतो. यानंतर ऑस्ट्रेलियात आल्यानंतर आम्हाला पुन्हा 14 दिवस क्वारंटाईन राहावे लागले. याचा अर्थ आम्ही जवळजवळ 1 महिना क्वारंटाईनमध्ये राहिलो आहे. आता आमची क्वारंटाईनमध्ये जाण्याची इच्छा नाही.”
तो सुत्र पुढे म्हणाला, “आम्ही ब्रिस्बेनला जाण्यास तयार नाही, कारण तिथे गेल्यानंतर पुन्हा आम्हाला एका रूममध्ये बंद करण्यात येईल व केवळ मैदानात जाण्याची परवानगी असेल. जर शेवटचा सामना दुसऱ्या कोणत्या शहरात असेल तर आम्हाला काही हरकत नाही. कारण आम्ही दोन सामने खेळून भारतात परतणार आहोत. आम्ही वर्तमान काळातील परिस्थितीशी परिचित असून, आम्ही पूर्ण सहकार्य करत आहोत. आम्ही सर्व नियम देखील पाळत आहोत. आता आमची इच्छा आहे की एकदा सिडनीमध्ये आमचा क्वारंटाईन कालावधी संपला की आम्ही सर्वसामान्य ऑस्ट्रेलियन व्यक्तीप्रमाणे जगावे.”
भारतीय संघाच्या या भूमिकेमुळे आता बघणे उत्सुकतेचे ठरेल की चौथा कसोटी सामना कोठे पार पडतो.
महत्त्वाच्या बातम्या –
…. म्हणून इंग्लंडच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली, कर्णधार जो रूटने केले स्पष्ट