भारताने शनिवारी बांगलादेश विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात एक डाव आणि 130 धावांनी (Won By An Inning & 130 Runs) विजय मिळवला. या विजयाबरोबरच 2 सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने भारताने आघाडी घेतली.
या मालिकेतील दुसरा सामना आता 22 नोव्हेंबरपासून कोलकाता (Kolkata) येथे सुरु होईल. हा सामना दिवस-रात्र कसोटी (Day-Night Test Match) सामना असणार आहे. तसेच भारताचा हा पहिलाच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. त्यामुळे या सामन्याची तयारी करण्यासाठी भारतीय संघ इंदोरमध्येच (Indore) थांबणार आहे.
आज (17 नोव्हेंबर) संध्याकाळी भारतीय संघ सराव करणार होता. पहिला कसोटी सामना तीन दिवसातच संपला. त्यामुळे मिळालेल्या वेळेचा वापर करण्यासाठी भारतीय संघापाठोपाठ बांगलादेशच्या संघानेही इंदोरमध्ये थांबण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय संघाचे लक्ष हे सूर्यास्तावेळी सराव करण्यावर असेल. जे खेळाडू गुलाबी चेंडूने खेळले आहेत, त्यांच्यानुसार सूर्यास्ताची वेळ ही दिवस-रात्र कसोटीत आव्हानात्मक असते.
“सूर्यास्तावेळी सरावावर लक्ष केंद्रीत केले जाईल. कारण, आम्हाला माहिती नाही की, सूर्यास्तावेळी चेंडू कशाप्रकारे कार्य करेल,” असे नाव न सांगण्याच्या अटीवरून एका सूत्राने पीटीआयला (PTI) सांगितले.
“सूर्यास्तावेळी गुलाबी चेंडू दिसण्यास कठीण असते. कारण, आकाशातील लाल रंगांमुळे चेंडू नारंगी रंगाप्रमाणे दिसतो,” असे दुलीप ट्राॅफीत (Dulip Trophy) गुलाबी चेंडूने खेळलेल्या चेतेश्वर पुजारा (Cheteshwar Pujara) आणि इतर खेळाडूंनी सांगितलेे होते.
दोन्हीही संघ 19 नोव्हेंबरला कोलकाताला रवाना होतील.
'कॅप्टनकूल' धोनीला मागे टाकत कर्णधार कोहली बनला असे करणारा पहिलाच भारतीय!
वाचा????https://t.co/azWzNvsWTL????#म #मराठी #INDvsBAN #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #TeamIndia #ViratKohli— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019
आयपीएल २०२०: कोणत्या संघाने कोणाला केले कायम आणि कोणाला दिला डच्चू, घ्या जाणून
वाचा???? https://t.co/2tYLomvRnc????#म #मराठी #Cricket @Mazi_Marathi @BeyondMarathi #IPL2020— Maha Sports (@Maha_Sports) November 16, 2019